Share

९ ऑगस्ट ठरला ऑस्ट्रेलिया क्रिकेट इतिहासातील सर्वात वाईट दिवस

Published On: 

मुंबई : आगमी टी-२० विश्वचषकाची तयारीसाठी बांग्लादेशच्या दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला अखेरच्या सामन्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. बांग्लादेशने दिलेल्या १२३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संपुर्ण संघ अवघ्या ६२ धावांवर अटोपला. यासह बांग्लादेशने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिका ४-१ अशी जिंकली आहे.

क्रिकेटविश्वातील दिग्गज संघ म्हणून ओळख असलेला ऑस्ट्रेलियाला बांग्लादेशविरुद्धच्या या मालिकेत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. पाच टी-२० सामन्याच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या संघाला केवळ एकाच सामन्यात विजय मिळवता आला. मालिकेतील पहिले तीन सामने गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने चौथा सामना जिंकत पुनरागमन केले. मात्र मालिकेतील अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची कामगिरी त्याच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात वाईट कामगीरी ठरली.

अखेरच्या टी-२० सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाने कमकुवत बांग्लादेशपुढे अक्षरश: गुडघे टेकले. या सामन्यात १२३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ अवघ्या ६२ धावांवर बाद झाला. या सामन्यात केवळ १३.४ षटकात ऑस्ट्रेलियाचा संपुर्ण संघ बाद झाला. क्रिकेट इतिहासात ऑस्ट्रेलियाचा संघ प्रथमच इतक्या कमी षटकात बाद झाला. ऑस्ट्रेलियाने १५ मार्च १८७७ साली पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. यानंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया पहिल्यांदा इतक्या कमी षटकात बाद झाला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!