Share

‘आई माझी काळुबाई’चा वाद आता थेट उदयनराजेंच्या दरबारात

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेतील वाद आणखी वाढत चाललेला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये आणि अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यातल्या वाद आता साताऱ्याचे उदयनराजे भोसले यांच्या दरबारात येऊन पोहोचला आहे.

प्राजक्ताने मध्यंतरी घेतलेल्या पत्रकार परिषेत खुलासा केला होता कि, मला मालिकेतून काढले नसून मी स्वतः ही मालिका सोडली आहे. मला सेटवरती शिवीगाळ झाली असून मी ही मालिका सोडली आहे. मला काढून टाकल्याच्या अफवा पसरवत आहेत हे चुकीचं आहे. पुढे ती म्हणाली तुमच्या मुलींसोबत असं काही घडलं असतं तर अलका ताई अशाच वागल्या असत्या का ?’ असा सवालही तिने उपस्थित केला होता. मालिकेबद्दल प्राजक्ताने बरेच खुलासे देखील केले.

दरम्यान ‘या’ मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल यांनी आता थेट रविवारी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. खासदार उदयनराजे यांनी अलका कुबल यांची बाजू जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडसोबत फोनवर चर्चा करुन हा वाद लवकरात लवकर मिटवावा, अशी विनंती केल्याची माहिती मिळाली आहे.

अलका कुबल यांनी प्राजक्ता गायवाडची माफी मागावी, अशी मागणी केली आहे. तसेच मालिकेतील प्रमुख कलाकार रवी सांगळे यांना मालिकेतून काढून टाकावे अन्यथा साताऱ्यात सुरु असलेले ‘माझी आई काळुबाई’ या मालिकेचं चित्रीकरण बंद पाडण्याची धमकी दिली जात आहे. याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये आणि समीर आठल्ये यांनी साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन वस्तुस्थिती मांडली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!