Share

‘कोण आला रे कोण आला आरपीआय चा वाघ आला’

Published On: 

मुंबई  – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले आणि त्यांच्या पत्नी सौ.सीमाताई आठवले यांनी 12 दिवस वैद्यकीय उपचार घेऊन कोरोना वर मात केली आहे. आज सकाळी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर बांद्रा येथील त्यांच्या संविधान  निवासस्थानी   रामदास आठवले यांचे सपत्नीक आगमन होताच रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड आनंद उत्साहात भव्य स्वागत केले.

ढोल ताशा संबळ च्या तालावर ठेका धरून आणि गुलाब पाकळ्यांच्या पुष्प वर्षावात हर्षोल्हासात  रामदास आठवले आणि  सीमाताई आठवले यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी कोण आला रे कोण आला आर पी आय चा वाघ आला या गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

रामदास आठवले यांना गेल्या 27 ऑक्टोबरला कोरोनाची लागण झाली होती.आठवले कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात देखील सतत लोकांच्या सेवेसाठी सोबतच पक्षवाढीसाठी काम करणारे रामदास आठवले हे कोरोना बाधित झाल्याने रिपाईचे अनेक कार्यकर्ते साहेब लवकर बरे व्हावेत यासाठीं प्रार्थना करत होते.

या प्रार्थना आणि डॉक्टरांची मेहनत फळाला आली असून आता आठवले हे कोरोनामुक्त झाले आहेत. नुकताच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आठवले कोरोनामुक्त झाल्याचं कळताच अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या घराजवळ शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती.

कोरोनाची लागण झाल्यानंतर तब्बल 12 दिवसांनी त्यांची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात आली होती. अखेर त्यांची ही चाचणी कोरोना निगेटिव्ह आली आहे. मी पुन्हा एकदा लोकांची सेवा करण्यासाठी सज्ज झालो आहे, असेही रामदास आठवले म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!