मुंबई : मुख्यमंत्र्यांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे काल आवाहन केले होते. यावरच गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला समर्थन दिले आहे. लतादीदींनी ट्विटरवरून आपल्या चाहत्यांना, राज्यातील जनतेला फटाके न फोडण्याचे आवाहन केले आहे. फटाके फोडण्याऐवजी दिवे लावून दीपोत्सव साजरा करावा, असे लतादीदी म्हणाल्या.
महाराष्ट्र के मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे जी ने आज टेलीविज़न पे जो कहा उसपर सबने अमल करना बहुत ज़रूरी है ऐसा मुझे लगता हैं. दिवाली में पटाखे कम से कम जलाए, प्रदूषण को रोकें ,प्रकाश का पर्व मनाएँ, दीपोत्सव मनाएं.मास्क अवश्य लगाएँ.अपना,अपने परिवार का और समाज का ख़याल रखें. pic.twitter.com/9PB4E2jG1p
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) November 8, 2020
राज्यात कोरोनामुळे बनलेली भीषण परिस्थिती आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. प्रदूषणामुळे कोरोनाचा संसर्ग वाढतो. त्यामुळे प्रदूषण करणारे फटाके टाळा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे. आतापर्यंतचे सर्व सण साधेपणाने साजरे केले. गेले ८ महिने जनतेने जे सहकार्य केले त्याला तोड नाही. या सहकार्यामुळेच आपण तणावमुक्त आहोत. दुसऱ्या लाटेची चिंता आहे. ती येऊ नये यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.
‘सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवू नका, रोषणाई करा. आजूबाजूला त्रास होणार नाही, याची काळजी घेऊन प्रदूषण होणार नाही असे फटाके वाजवा. पोलीस, महसूल, आरोग्य सेवक, डॉक्टर अत्यंत तणावाखाली जनतेसाठी लढत आहेत. कोरोनाविरोधात लढण्यासाठी आता आपल्याजवळ मास्कशिवाय दुसरं शस्त्र नाही,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील सिनेमागृहे पुनर्जीवित करण्याला राज्य शासन प्राधान्य देणार : थोरात
- माझ्या जीवाला धोका आहे, माझ्यावर अन्याय होत आहे – अर्णब गोस्वामी
- ‘मिलिंद सोमण, उम्र पचपन की और हरकते बचपन की…,’
- ‘गोस्वामी यांच्या जीविताला काही धोका झाल्यास, त्याची जबाबदारी महाआघाडी सरकारची राहिल’
- राज्य सरकारने शिवाजी महाराजांचे नाव घेऊन त्यांना बदनाम करु नये- नारायण राणे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

