Share

‘पंकजा मुंडेंच्या कारखान्यावरील ती कारवाई म्हणजे अफवा’, कार्यकारी संचालकाचे स्पष्टीकरण

Published On: 

बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे चेअरमन असलेल्या बीड जिल्ह्यातील पांगरी (ता. परळी) येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) औरंगाबाद विभागीय कार्यालयाने जप्त केले. त्याद्वारे ९२ लाख रुपयांची थकबाकी वसूल केली.

कारखान्याकडे मार्च २०१८ ते ऑगस्ट २०१९ या काळातील कर्मचारी व कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची एकूण १.४६ कोटी रुपये रक्कम थकीत होती. या कारवाईचे प्रकरण काल शुक्रवारी राज्यात चांगलेच गाजले होते.

दरम्यान, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे कोणतेही बँक खाते जप्त झाले नाही, असे स्पष्टीकरण कारखान्याचे कार्यकारी संचालक जी.पी.एस दीक्षितुलू यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिले आहे. दुष्काळ आणि अन्य आर्थिक कारणांमुळे पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना सध्या आर्थिक अडचणीतून जात आहे.

अशा कठीण परिस्थितीत अशा प्रकारचे वृत्त माध्यमातून येत असून यामुळे सामान्य शेतकऱ्यांचे भवितव्य धोक्यात आणणे एकूणच राजकीय खोडसाळपणाचे आहे. कारखान्याचे असे कोणतेही खाते सील झालेले नाही, असे पत्रकात म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!