Share

‘ठाकरेंची तिसरी पिढी असफल’, मुंबईत साचलेल्या पाण्यामुळे खासदार नवनीत राणांचा हल्लाबोल

Published On: 

मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतरची तिसरी पीढी ‘असफल’ ठरली असल्याची टीका अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. मुंबईत पावसाचे पाणी साचल्यामुळे अनेक नागरिकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. त्यातच दरड कोसळल्यामुळे ३० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या सर्वाला मुंबई महानगर पालिका आणि ठाकरे परिवार जबाबदार असल्याचे खासदार राणा यांनी म्हटले आहे.

संसदेच्या अधिवेशनामुळे खासदार राणा सध्या दिल्लीत आहेत. मात्र, त्यांनी मुंबईतील पावसामुळे झालेल्या परिस्थितीवरुन ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. आदित्य ठाकरे मुंबई महानगर पालिकेच्या माध्यमातून नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यास कमी पडले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या संदर्भात सोशल मीडियावर त्यांनी टीका करताना खासदार राणा म्हणाल्या की, ‘मुंबई तुंबली, मुंबई महानगर पालिका बुडाली पाण्यात, ठाकरेंची तिसरी पिढी असफल, मनपाचे पावसाळापूर्व नियोजनाचे तीनतेरा, माझी मुबंई माझी जबाबदारी म्हणणाऱ्या ठाकरे परिवाराच्या अनागोंदी कारभारामुळे सर्व मुंबईकरांना नाहक त्रास.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!