Share

अहमदपूरात शॉटसर्किटमुळे लागलेल्या आगीत दहा एकर उस जळून खाक

Published On: 

🕒 1 min read

लातूर : जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील शिरुर ताजबंद थोरले वाडी परिसरातील पाच शेतकऱ्यांच्या उसाला शॉटसर्किटमुळे आग लागली. बुधवारी दुपारी २ च्या सुमारास लागलेल्या या आगीत एकूण पाच शेतकऱ्यांचा ऊस व दोन शेतकऱ्यांचे पाईप, ठिबकंसिंचनाच्या नळ्या जळून खाक झाल्या. या भरउन्हात ही आग लागील आसल्याने रौद्ररुप धारण केले होते. यामुळे परिसरात भितीचे वातवरण निर्माण झाले होते.

परिसरातील नागरिकांनी तात्काळ अहमदपूर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला संपर्क केला. काही वेळातच अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळावर दाखल झाली आणि त्यांनी आग नियंत्रणात आणली. मात्र तोपर्यत शेजारी असलेल्या दैवशाला अशोक फुलमंटे व बालाजी दिलीप वलसे या दोन शेतकऱ्याचे शेतीचे साहित्य व पाईप जळुन खाक झाले होते. यावेळी शिरुर ताजबंद चे तलाठी नवनीत जामनिक यांनी पंचनामा केला.

शॉटसर्किटमुळे लागलेल्या या आगीत सुधाकर फुलमंटे एक हेक्टर, सचिन वलसे १.४० हेक्टर, पद्मीनबाई वाढवणकर १.२० हेक्टर, अरंविद फुलमंटे १.४८ हेक्टर व गोंविद वलसे ०.३२ हेक्टर अशा एकूण पाच शेतक-यांचा ऊस जळून खाक झाला. वलसे आणि फुलमंटे यांच्या शेतीतून वीज वितरण कंपनीच्या तारा गेलेल्या असल्यामुळे आग लागली असावी असे स्थानिकांचे म्हणणे आहे. काही दिवसांतच हा ऊस साखर कारखान्याला जाणार होता आणि शेतक-यांनी वर्षेभर केलेल्या मेहनतीचे फळ त्यांना मिळणार होते परंतु या आशेवर पाणी फिरले आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!