🕒 1 min read
इंग्लंड : जागतिक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेला आज पासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेला अवघे काही तासच उरले आहेत. सगळीकडे या सामन्याची उत्सुकता लागली आहे. या सामन्यासाठी भारत आणि न्युझीलंड दोन्ही संघ साउथहॅमप्टटनमध्ये आहेत. आज दुपारी ठीक अडीज वाजता विराट आणि केन नाणेफेकीसाठी मैदानात जातील. आतापर्यंतच्या सगळ्यात प्रतिक्षेत असलेली नाणेफेक उडवली जाईल. टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंडच्या अंतिम सामन्याला ठीक तीन वाजता होणार आहे.
या स्पर्धेआधी आयसीसीच्या स्पर्धेत भारताने न्युझीलंड विरुद्ध अखेरचा विजय हा २००३ च्या विश्वचषकात मिळवला होता. यानंतर भारताना न्युझीलंडविरुद्ध सतत अपयश आले आहे. २००३ च्या विश्वचषक स्पर्धेत भारताने न्युझीलंडला ७ गडी राखुन पराभव केले होते. यानंतर २००७ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ जगज्जेता ठरला होता. मात्र या स्पर्धेतील एकमेव सामना भारताने न्युझीलंडविरुद्ध १० धावांनी गमावला होता. यानंतर २०१६ टी-२० विश्वचषक स्पर्धेत ४७ धावांनी पुन्हा न्युझीलंडविरुद्ध पराभुत झालो होतो. तर डब्ल्युटीसी स्पर्धेतील कसोटी मालिकेतही भारताला २-० असा पराभव स्विकारावा लागला. तर २०१९ विश्वचषक स्पर्धेतील भारताचा संघाचा पराभव क्रिकेट रसिक आजही विसरु शकले नाही.
डब्ल्युटीसी सामन्यात भारतीय संघाला न्युझीलंडचा सामना करायचा आहे. मागील १८ वर्षापासुन जेव्हा आयसीसीची कोणतीही स्पर्धा येते तेव्हा न्युझीलंड संघाविरुद्ध भारताला कायम हार पत्कारावी लागली आहे. मात्र आता डब्ल्युटीसी सामन्यात भारतीय संघ १८ वर्षे पराभवाची साखळी तोडतो का न्युझीलंडचा संघ भारताविरुद्ध विजयरथ कायम राखतो याची उत्सुकता क्रिकेट रसिकांना लागली आहे.
महत्वाच्या बातम्या
- नितीन गडकरींना धक्का! अमरावतीचे डॉ.सुनील देशमुख काँग्रेसमध्ये
- कुठे आणि कधी पाहता येणार WTC चा अंतिम सामना ?, वाचा सविस्तर
- नताशा, देवांगना, आसिफला मिळालेला जमीन सरकारच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणारा
- कल्पक उपक्रमासाठी सीईओ डॉ. गोंदावले यांचा शिक्षण संस्था महामंडळाच्या वतीने सत्कार
- उस्मानाबादेत राष्ट्रवादीला आले उधाण; तीन मोठे नेते दौऱ्यावर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
