नवी दिल्ली : कोरोना काळात डॉक्टर जीव धोक्यात घालून रुग्णसेवा देत असताना त्यांच्यावर व रुग्णालयांवर हल्ले सुरूच आहेत. वाढत्या हल्ल्यांमुळे रुग्णांना सेवा देताना निर्भयपणाचे वातावरण राहिले नाही. एका दबावाखाली रुग्णसेवा द्यावी लागत आहे. यामुळे डॉक्टरांवरील हिंसाचार रोखण्यासाठी केंद्रीय कायदा पारित करावा, या मागणीसाठी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) च्या वतीने काल शुक्रवारी राज्यभरात ठिकठिकाणी निदर्शने करीत आंदोलन करण्यात आले.
या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज शनिवारी राज्य सरकारांना महत्त्वाचा आदेश दिला आहे. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्या समाजकंटकावर गुन्हा दाखल करण्याचा तसेच साथरोग कायदा (सुधारित) २०२० अंतर्गत कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी राज्यांना तसेच केंद्र शासित प्रदेशांना हे पत्र पाठवलं आहे.
Union Home Secretary Ajay Bhalla writes to chief secretaries and administrators of all States/UTs for implementation of a slew of measures to check incidents of attacks of healthcare workers pic.twitter.com/f7ypldIdal
— ANI (@ANI) June 19, 2021
पत्रात म्हटलंय की, डॉक्टर्स अथवा आरोग्य कर्मचाऱ्यांना धमकी अथवा हल्ला झाल्याने त्यांचे मनोबल कमी करु शकते. तसेच त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करु शकते. याचा परिणाम आरोग्य यंत्रणेवर पडू शकतो. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांमध्ये जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेत. तसेच आरोपींवर अशा प्रकरणांमध्ये गतीने कारवाई झाली पाहिजे. आपण परिस्थितीनुसार साथरोग (सुधारित) २०२० कायद्यातील तरतुदींचा देखील वापर करु शकता असेही पत्रात नमुद केलेय.
महत्त्वाच्या बातम्या
- शिवसेनेचे खोतकर केंद्रीय मंत्री दानवेंवर पडले भारी! ‘त्या’ पाच पोलिसांचे निलंबन मागे
- ‘दोन पक्षांच्या कुबड्यावर धंदा चाललाय आणि दिल्ली जिंकल्याच्या बाता करताहेत’
- महाविकास आघाडी किती दिवस टिकणार? उद्धव ठाकरेंनी दिले रोखठोक उत्तर
- ‘ममतांचे कौतुकच, कारण त्यांनी सत्तेसाठी युती मोडत विश्वासघात नाही केला’, भाजपचा शिवसेनेला टोला
- विरोधकांच्या टीकेनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय! म्हणाले, ‘मी लवकरच घराबाहेर पडणार आहे’


