Share

मोर्चाला परवानगी नाकारली : ‘हे नपुंसक सरकार मनसेला घाबरते’, मनसे आक्रमक

Published On: 

मुंबई : टाळेबंदीच्या काळात सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना सरकारने पाठवलेल्या भरमसाठ वीजबिलामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे.राजकीय पटलावर देखील सध्या वाढीव वीजबिलांचा मुद्दा चांगलाच गाजतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाढीव वीजबिल माफीसाठी आक्रमक झाली असून राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटमचा कालावधी देखील पूर्ण झाला आहे.

त्यामुळे मनसेने राज्यातील विविध शहरात आंदोलनाची हाक दिली होती. आज हे आंदोलन करण्यात येत असून ठिकठिकाणी पोलीस आणि कार्यकर्त्यांच्यात संघर्ष निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज, मुंबई, ठाणे, औरंगाबाद, पुणे, नाशिक, पनवेल आदी शहरांत मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरत आहेत. मात्र, या सर्वच शहरात मनसेच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे कर्त्याकर्ते आणि पोलिसांत संघर्ष सुरु असल्याचं दिसून येत आहे.

वाढीव वीजबिल प्रकरणी काहीही झाले तरी आंदोलन होणार असल्याचं वक्तव्य मनसे नेते अविनाश जाधव यांनी केले आहे.किती वेळा आम्हाला दाबणार, भाजप मोर्चा काढते त्याला परवानगी मिळते. मनसे मोर्चा काढतो त्या परवानगी नाही, हा कुठला न्याय आहे, असा सवाल अविनाश जाधव यांनी केला आहे. ठाकरे सरकार मनसेला घाबरते, हे नपुंसक सरकार आहे. हे सरकार उखडून फेकायचं आहे. काँग्रेसला श्रेय मिळू नये यासाठी शिवसेनेचा डाव आहे. महाराष्ट्रात आंदोलने होणारचं, मला तडीपार करायचं करा, असं आव्हान मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!