मुंबई- राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना आता ओबीसींच्या मुद्द्यावरून मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार एक इशारा दिला आहे. वेळ पडल्यास ओबीसींच्या मागण्यासाठी राज्यभर महामोर्चे काढू असा थेट इशारा दिलाय.
TV9 मराठीशी बोलताना ते म्हणाले,ओबीसींचा एल्गार दिसायलाच हवा, एक लाख पदांचा ओबीसींचा बॅकलॉग आहे, याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय, मराठा समाजाच्या जागा वेगळ्या ठेवून सर्व भरती होणार आहे. ओबीसींच्या प्रश्नासाठी विभागीय मेळावे घेणार आहे.ओबीसींचा अनुशेष पहिल्यांदा भरा, मग मेगा भरती करा. मराठ्यांवर अन्याय होऊन नये, पण ओबीसींची भरती थांबायला नको.
मराठा नेत्याने समाजाचा मेळावा घेतला तर तो ओबीसीविरोधी ठरत नाही, मग ओबीसींचा मेळावा मराठा समाजाविरोधी कसा? असा प्रश्न वडेट्टीवारांनी केला होता. तसेच जर मेळावे घेणं चूक असेल तर निवडणूक काळात मेळावे घेणाऱ्या नेत्यांना मत मागताना लाज वाटत नाही का? असाही सवाल विजय वडेट्टीवारांनी विचारला होता.
महत्वाच्या बातम्या
- … तर भाजपा मराठा आंदोलनाचं नेतृत्व करण्यास तयार आहे
- काँग्रेसच्या ‘या’ माजी मंत्र्याला तीन दिवसांची सीबीआय कोठडी
- २६/११ : वीर शहिदांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन
- बौद्धजन पंचायत समिती या धार्मिक संघटनेत मी कधीही ढवळाढवळ केली नाही – रामदास आठवले
- लक्ष्मी विलास बँकेचं डीबीएस बँकेत विलीनीकरण करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

