Share

एकरकमी ‘एफआरपी’साठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; दोन ट्रॅक्टरला लावली आग

Published On: 

सांगली : एकरकमी ‘एफआरपी’साठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून मध्यरात्री कार्यकर्त्यांकडून राजारामबापू व क्रांती सहकारी साखर कारखान्याच्या दोन ट्रॅक्टरला आग लावण्यात आली आहे. त्यामुळे आता आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राजारामबापू कारखान्याचे सर्वेसर्वा पालकमंत्री जयंत पाटील असून क्रांतीचे अध्यक्ष आ. अरूण लाड व विश्वासचे अध्यक्ष आ. मानसिंगराव नाईक आहेत. एकरकमी एफआरपी मिळावी अशी स्वाभिमानीची मागणी असून या मागणीला कोल्हापूर जिल्ह्य़ात सकारात्मक प्रतिसाद मिळाला. पंरतु सांगली जिल्ह्य़ात दालमिया व दत्त इंडिया हे दोन कारखाने वगळता प्रतिसाद मिळालेला नाही. यामुळे स्वाभिमानीचे कार्यकत्रे आक्रमक झाले आहेत.

दरम्यान, यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधतांना स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले की, ‘कारखान्यांना एकरकमी एफआरपी जाहीर केल्याविना कारखाने सुरू करू दिले जाणार नाहीत. दत्त इंडिया व दालमिया खासगी असून एकरकमी देण्याचे मान्य करतात. मग इतकी वर्षे सहकारात साखर कारखाने चालू असताना शेतकऱ्यांचे पैसे द्यायच्या वेळीच आर्थिक अडचणी का सांगितल्या जातात. हे कारखानदार शेतकऱ्यांना लुटण्याचा उद्योग करीत आले असून हे यापुढे सहन केले जाणार नाही.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!