Share

‘कंगनाच्या सौंदर्यासमोर काहींना स्वातंत्र्य आंदोलनातील शहीदांचा अपमान ही जाणवत नाही का?’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ‘भारताला १५ ऑगस्ट १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले’, अशी मुक्ताफळे बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने एका कार्यक्रमात उधळली आहेत. कंगनाच्या या वक्तव्यानंतर देशभरातून तिचा निषेध व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर तिच्या वक्तव्यावरुन संतापाची लाट उसळली आहे. तसेच तिला मिळालेले पुरस्कार परत घ्यावेत, अशी देखील मागणी होताना दिसत आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी कंगनावर टीका करत तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली आहे.

कंगनाच्या सौंदर्यासमोर काहींना स्वातंत्र्य आंदोलनातील शहीदांचा अपमान ही जाणवत नाही का? स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करणारे मोदी आणि महाराष्ट्रातील त्यांचे देशभक्त नेते अजूनपर्यंत का गप्प आहेत?, असा खोचक सवाल अमोल मिटकरींनी केला आहे.

दरम्यान, कंगना रानौतच्या म्हण्यानुसार देशाला १९४७ मध्ये जे स्वातंत्र्य मिळाले ती भीक होती, खरे स्वातंत्र्य २०१४ ला मिळाले. ह्या कंगुबाईने केलेलं हे वक्तव्य देशासाठी बलिदान देणाऱ्या तमाम देशभक्तांचा अपमान असून या बाईवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी मिटकरी यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!