🕒 1 min read
मुंबई: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग (Parambir Singh) यांच्या विरोधातील खंडणी प्रकरणी दाखल याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मागील वेळी न्यायालयाने परमबीरसिंह यांना अटकेपासून संरक्षण दिले होते. पोलिस महासंचालकांकडून पाठवण्यात आलेला निलंबनाचा आदेश स्वीकारण्यास परमबीरसिंह यांनी दिला नकार होता. मात्र अखेर त्यांना निलंबनाचा आदेश स्वीकारावा लागला.
शंभर कोटींच्या खंडणी प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने परमबीरसिंग यांना चांगलेच सुनावले असल्याची माहिती समोर आली आहे. न्यायाधीश एस.के.कौल (Justice S.K. Kaul) म्हणाले की, हे अतिशय अस्वस्थ करणारे आहे. पोलीस दलाचा प्रमुख असलेल्या व्यक्तीचा त्याच दलावर विश्वास नसेल, तर आम्ही काय म्हणायचे. आतापर्यंत आम्ही तुम्हाला खूप संरक्षण दिले आहे. आता यापुढे तुम्हाला संरक्षण मिळणार नाही, अशा स्पष्ट शब्दात परमबीरसिंग यांना त्यांनी सुनावले आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Parambir Singh) यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच न्यायालयाने अनेक वेळा परमबीरसिंग यांना अटकेपासून संरक्षण दिले होते. मात्र आज झालेल्या सुनावणी दरम्यान परमबीरसिंग यांना आता कुठलेच संरक्षण नसणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- मोठी बातमी! टाटा कंपनीची आयपीएलमध्ये एंट्री; बीसीसीआयने दिली ‘ही’ संधी
- मायावती विधानसभा निवडणूक लढणार नाहीत; बसपा खासदार सतीशचंद्र मिश्रा यांची माहिती
- मोदींच्या मातोश्री, इराणी यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यास चोप देणाऱ्या महिलांचे भाजपने केले कौतुक
- “भाजपचे धोकादायक ‘टेक फॉग’ ॲप द्वेषाचे विष पेरते”, काँग्रेसने ‘तो’ व्हिडिओ पोस्ट करत साधला निशाणा
- ‘पूर्वी म्हणायचे देश धोक्यात, आता म्हणतात मोदी धोक्यात’; नाना पटोलेंचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
