नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षासंदर्भातील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाला दोन मोठे धक्के दिल्याचा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. त्याप्रमाणे 5 न्यायाधीशांचे घटनापीठ यावर निर्णय देणार आहे. 25 तारखेला यावर सुनावणी होणार आहे. मात्र आम्हाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी व्यक्त केली.
यावेळी त्यांनी घटनापीठ स्थापन करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय शिवसेनेसाठी अनुकूल असल्याचे सूचित केले. त्यांनी म्हटले की, सर्वोच्च न्यायालयात आज महाराष्ट्रातील घडामोडींबाबत सुनावणी झाली. त्यावेळी शिवसेनेतून फुटून गेलेल्या गद्दारांनी १६ आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांना घेऊन द्यावा, अशी मागणी केली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळत हे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग केल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray। मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच विधानभवनात हजर
- Eknath Shinde । “माझ्याकडे सगळ्यांचा चिठ्ठा एक-एक काढू शकतो, परंतु…” ; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना इशारा!
- Shrikant Shinde । रिक्षावालाच भारी, मर्सिडीज मधून पक्ष वाढू शकत नाही; श्रीकांत शिंदेंची थेट आदित्य ठाकरेंवर टीका
- CM Eknath Shinde | मुंबई पालिका क्षेत्रातील रस्ते काँक्रिटचे करणार ; एकनाथ शिंदेंची विधानसभेत माहिती
- Devendra Fadnavis । गोंदिया, भंडारा बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपींवर कडक कारवाई केली जाणार – देवेंद्र फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

