🕒 1 min read
नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या याचिकेवरील सुनावणीतून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी माघार घेतली आहे. आपण या प्रकरणी सुनावणी करू शकणार नाही,असे त्यांनी सांगितले. विभागीय चौकशी करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या आदेशाविरोधात परमबीर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होती. परंतु न्या.गवई खटल्यातून बाजूला झाल्याने सुनावणी झाली नाही.
या पीठाचे सहकारी न्या. गवई यांना या प्रकरणाच्या सुनावणी करण्याची इच्छा नसल्याचे खंडपीठाचे दुसरे न्या.विनीत शरण यांनी सांगितले.न्या. गवई यांनी मुंबई उच्च न्यायालयातही काम केले आहे. त्यामुळे या खटल्यातून ते स्वत:च बाजूला झाले आहेत. नव्या पीठासमोर याचिकेची सुनावणी घेण्यात यावी,अशी विनंती न्या.गवई यांनी सरन्यायधीश ए.व्ही.रमणा यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, राज्य सरकारचे अधिकारी एखाद्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी आपल्याला देत असल्याचे परमबीर यांनी याचिकेत म्हटले आहे. त्यांनी फोनवर आलेल्या धमक्यांची टेपही याचिकेसोबत न्यायालयात दाखल केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मराठा आंदोलकांच्या खांद्याला खांदा लावून सहभागी होईल’, आ. राणाजगजितसिंह यांची माहिती
- आमदार निवासासाठी ९०० कोटी रुपये खर्च करण्याऐवजी हा पैसा सामान्यांसाठी वापरा : करुणा मुंडे
- बोगस ‘ई-पास’ बनवणाऱ्या तिघांना अटक; उस्मानाबाद पोलिसांची कारवाई
- ‘लसीकरण पूर्ण झाल्यावर आपण कोरोनाची तिसरी लाट नक्की रोखू शकू’, सुप्रिया सुळे यांचे मत
- वीरु धावला कोरोनापीडीतांसाठी, सुरु केली ‘राहत की सास’; गरजुंना मिळणार मोफत ऑक्सिजन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
