Share

अनाथांना आधार : पालकांचे कोरोनाने निधन झाल्यास मोफत शिक्षण आणि महिन्याला पेन्शन

Published On: 

🕒 1 min read

दिल्ली : राज्यासह देशभरात गेल्यावर्षी पासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. यामुळे अनेकांना आपल्या जवळील व्यक्तींना गमवावं लागलं आहे. अशातच, कडक निर्बंध, टाळेबंदी, व्यवसायांमधील मंदी यामुळे लाखो लोकांना रोजगार गमवावा लागला आहे. उदरनिर्वाहाचा प्रश्न आणि अशातच पाल्यांच्या शाळांकडून फी ची मागणी याने आर्थिक विवंचनेत भर पडली आहे.

शाळांनी कोरोना काळातील वाढीव फी माफ करावी. तसेच, प्रत्यक्षात शाळा सुरु नसल्याने फी कमी करावी अथवा ती आकारण्यात येऊ नये अशी मागणी गेल्या वर्षभरात केली जात आहे. हा मुद्दा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला आहे. तर, कोरोनाने पालकच गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडचण निर्माण होण्याची भीती निर्माण व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आता एक अत्यंत स्तुत्य निर्णय घेतला आहे. ‘ज्या लहान मुलांचे आई आणि वडील दोघांचेही कोरोनाने निधन झाले आहे किंवा एकाचा आधीच मृत्यू झाला असेल आणि एकाचा कोरोनाने मृत्यू झाला तर त्यांना महिन्याला अडीच हजार रुपये पेन्शन मिळेल. ही पेन्शन ती मुलं 25 वर्षांची होईपर्यंत देण्यात येईल. यासोबतच मुलांना मोफत शिक्षणही देण्यात येणार असल्याचं,’ अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केलं आहे.

यासोबतच, ‘ज्यांच्या घरामध्ये कमावणारा एकच व्यक्ती असेल आणि त्याचाच कोरोनाने मृत्यू झाला तर त्यांनाही पेन्शन देण्यात येईल. दिल्लीत ज्यांच्याकडे कार्ड नाही, ज्यांना धान्याची गरज आहे त्यांनाही रेशन मिळेल. प्रत्येक गरजुला महिन्याला दहा किलो रेशन मिळेल,’ अशी दिलासादायक घोषणा देखील अरविंद केजरीवाल यांनी केल्यामुळे स्थलांतरितांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!