Share

‘खत दरवाढीचा फायदा घेऊन विरोधक अफवा पसरवतील, योग्य निर्णय घ्या’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गेल्या काही महिन्यात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने डोकं वर काढले आणि त्यातच पेट्रोल, डिझेल सोबतच घरगुती गॅस, डाळी, खाद्यपदार्थांच्या किंमतींचे दरही आस्मानाला भिडले आहेत. यामुळे सामान्य माणूस त्रस्त झाला असून घर चालवायचे कसे? असा प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थित होत आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसताना आता खासगी रासायनिक खतांच्या किंमतीमध्येही सरासरी ६०० ते ७०० रूपये एवढी विक्रमी दरवाढ केली गेली आहे.

यामुळे या खतांच्या दरवाढीला आता विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला जबाबदार धरत टीकास्त्र सोडलं आहे. यासंदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय खते व रसायने मंत्री सदानंद गौडा आणि केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना पत्र लिहून खासगी कंपन्यांनी खतांच्या दरात वाढ करू नये यासाठी योग्य निर्णय घेण्याची मागणी केली आहे.

‘भारत सरकार शेतकऱ्यांच्या हितार्थ अनेक चांगली पाऊल उचलत आहे. अचानकपणे फर्टिलायझर कंपन्यांनी किंमती वाढविल्या तर,विरोधक त्याचा फायदा घेऊन अफवा पसरवतील.त्यामुळे, शेतकऱ्याच्या हिताचा विचार करून योग्य तो निर्णय केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी घ्यावा अशी पत्राद्वारे विनंती केली,’ अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

यासोबतच, ‘खतांची किंमत वाढवली जात असल्याचा चुकीचा संदेश विरोधी पक्षाद्वारे शेतकऱ्यांमध्ये पसरवला जात आहे. मात्र कंपन्यांनी खतांच्या किंमती खरच वाढवल्या तर शेतकऱ्यांचे नुकसान होईल. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना पत्राद्वारे याविषयी त्वरित पाऊल उचलण्याचे आवाहन केले आहे,’ असं देखील पाटील यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!