🕒 1 min read
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत हे पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. संजय राऊत कोठडीत असल्यापासून त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत हे सतत त्यांची पाठराखण करताना दिसत आहेत. आजही त्यांनी माध्यमांशी संवाद साधत सरकारवर आणि बंडखोर आमदारांवर टीका केली. संजय राऊतांना आज जेजे हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आलं होतं, त्यावरून प्रतिक्रिया देत सुनील राऊत म्हणाले कि संजय राऊत यांची तब्येत ठीक आहे. त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही.
आज मैत्रीदिन असल्याच्या पार्श्वभूमीवर मुखमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे अशी इच्छा शिंदे गटातील काही आमदारांनी व्यक्त केली होती त्यावर सुनील राऊत म्हणाले, “त्यांना उद्धव ठाकरेंनी पक्षातून बाहेर फेकलंच नव्हतं. पक्ष सोडून तेच गेले आहेत. त्यांना जर पश्चाताप होत असेल तर त्यांनी उद्धवजींशी संपर्क साधावा.” तसेच यावेळी बोलताना त्यांनी न्यायालयात सुरु असलेल्या शिंदे विरुद्ध ठाकरे या लढाईचाही उल्लेख केला. “देशातील सर्व कायदेतज्ञांचं म्हणणं आहे कि, या आमदारांना अपात्र ठरवलं जाईल किंवा त्यांना दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागेल. त्यामुळे बघू किती जण विलीन होतायेत. शिवसेना हा पक्ष बाळासाहेबांनी मोठ्या कष्टाने बांधला आहे. त्यामुळे हा इतिहास आहे कि, ज्यांनी ज्यांनी हा पक्ष सोडला आहे त्या प्रत्येकाला बाळासाहेबांची हाय लागलेली आहे”, अशी जहरी टीका त्यांनी बंडखोर आमदारांवर केली.
महत्वाच्या बातम्या:
- Manisha Kayande | सावित्रीच्या लेकी म्हणायचं मग ही काय तुमची सावत्र लेक आहे का? – मनीषा कायंदे
- Ramdas Kadam । अजित पवार हे चांगले विरोधी पक्षनेते, त्यांना कायम विरोधी पक्षनेता राहण्यासाठी शुभेच्छा; रामदास कदमांचा टोला
- Ramdas Kadam । बाळासाहेब जिवंत असते तर शिवसेना काँग्रेससोबत गेली असती का? रामदास कदमांचा आदित्य ठाकरेंना सवाल
- Kirit Somaiya | पुढच्या नोव्हेंबर – डिसेंबरमध्ये मेट्रो रुळावर धावेल – किरीट सोमय्या
- Kishori Padnekar । “अशी कशी नशिबाने थट्टा मांडली”; अमृता फडणवीसांना पेडणेकरांचे जशास तसे उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
