🕒 1 min read
Ramdas Kadam । मुंबई : राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेनेला धक्का दिला, त्यांनतर सुरु झालेले आरोप प्रत्यारोपांचे सामने अजूनही थांबायचं नाव घेत नाहीत. कधी महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे गट, भाजप आणि मनसे, तर कधी मूळ शिवसेना विरुद्ध शिंदे गट असे सामने रंगताना दिसून येत आहेत. त्यातच आदित्य ठाकरे यांचे महाराष्ट्र भर सध्या दौरे सुरु आहेत. यानंतर आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंना सवाल करत टीका केली आहे.
रामदास कदम गेल्या काही दिवसांपासून ऍक्टिव्ह मोड मध्ये आले आहेत. तसेच सध्या त्यांच्या निशाण्यावर आदित्य ठाकरे आले आहेत. रामदास कदम म्हणाले की, बाळासाहेब जिवंत असते तर शिवसेना काँग्रेससोबत युती करु शकली असती का? याचं उत्तर मला आदित्य ठाकरे यांनी द्यावं आणि नंतर गद्दाराची व्याख्या ठरवावी. पर्यावरण मंत्री असताना माझ्या खात्याचा सर्व कारभार आदित्य ठाकरेच चालवायचे असा गौप्यस्फोटही त्यांनी केलाय. तसंच फ्रेन्डशीप डे साठी माझ्या मातोश्री आणि उद्धवजींना शुभेच्छा.
यानंतर पुढे ते म्हणाले कि, मी शिंदे आणि ठाकरेंना पुन्हा एकत्र आणण्यासाठी शिंदे गुवाहाटीला असताना प्रयत्न केला. मात्र तेव्हा ते झालं नाही. आता लढाई कोर्टात आहे. त्यामुळे आता ते एकत्र येतील की नाही यावर बोलणं योग्य नाही, असं सूचक वक्तव्यही रामदास कदम यांनी केलंय. मंत्रिमंडळ विस्तारावरुन विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवारहे सरकारवर टीका करत आहेत. त्याबाबत विचारलं असता अजित पवार हे चांगले विरोधी पक्षनेते आहेत. त्यांना माझ्या नेहमी विरोधी पक्षनेता राहण्यासाठी शुभेच्छा असल्याचा टोलाही कदम यांनी अजितदादांना लगावलाय.
महत्वाच्या बातम्या:
- Kirit Somaiya | पुढच्या नोव्हेंबर – डिसेंबरमध्ये मेट्रो रुळावर धावेल – किरीट सोमय्या
- Kishori Padnekar । “अशी कशी नशिबाने थट्टा मांडली”; अमृता फडणवीसांना पेडणेकरांचे जशास तसे उत्तर
- NCP | औरंगजेबाची समाधी महाराष्ट्रात आहे, हे दिल्लीश्वरांनी लक्षात घ्यावं – सुरज चव्हाण
- Devendra Fadnavis । आम्ही सरकारमध्ये आलो आणि ओबीसींना आरक्षण मिळालं; देवेंद्र फडणवीसांचा दावा
- MNS on Governor| राज्यपालांनी वादग्रस्त विधान करून आपल्या बुध्दीमत्तेची कुवत सिद्ध केली – हेमंत संभूस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
