दिल्ली : प्रजासत्ताक दिनी अवघ्या जगाचे लक्ष भारताकडे लागले असताना शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली समाजकंटकांनी राजधानी दिल्लीमध्ये धुडगूस घातला. शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला वेगळे वळण लागले.देशाच्या अस्मितेवर घाला घालणाऱ्या आंदोलकांनी पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न काल केला.
या झालेल्या घटनेवर भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले कि, दबक्या आवाजात एक चर्चा सुरू आहे. कदाचित त्यात काहीही तथ्य नसेल. ते खोटेही असू शकेल किंवा शत्रूंच्या आयटी सेलकडून वावड्या उठवल्या जात असतील की, ‘पीएमओ’च्या जवळील व्यक्तीने लाल किल्ल्यावरील हिंसाचाराला खतपाणी घालण्याचे काम केले. नीट तपासून माहिती घ्यावी’.
चिघळलेल्या शेतकरी आंदोलनात सामील असलेला आरोपी दीप सिद्धू हा भाजप खासदार सनी देओल यांच्या निवडणूक प्रचारात सहभागी झाला होता, अशा आशयाचं ट्विट सुब्रमण्यम स्वामी यांनी रिट्विट केलं आहे. यामुळे आता भविष्यात सुब्रमण्यम स्वामी कोणती भूमिका घेत आहेत हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
तसेच दिल्लीतील शेतकरी आंदोलन पेटणे हे सरकारचं अपयश अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया यावर येत असतानाच हरियाणातील शेतकरी नेते गुरणाम सिंह यांनी पंजाबी अभिनेता दीप सिद्धू याच्यावर आंदोलनामध्ये हिंसाचार घडल्याचा आरोप केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सीमाभागातील बांधवांसाठी संपूर्ण महाराष्ट्र एकत्र आहे, हे दाखवण्याची आता वेळ आली आहे’
- भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी राम मंदिर निर्माणासाठी दिला तब्बल ‘इतका’ निधी!
- प्रजासत्ताक दिनी ‘महाराष्ट्र देशा’च्या औरंगाबाद कार्यालयाचे शानदार उद्घाटन
- तासगावच्या उपनगराध्यक्षपदी दत्तात्रय रेंदाळकर यांची एकमताने निवड; शहरात जल्लोष
- शेतकरी आंदोलन फुटीच्या उंबरठ्यावर ? व्ही एम सिंह यांच्या गटाची आंदोलनातून माघार


