Share

१५ हजार लसींचा साठा दोनच दिवसात संपला! औरंगाबादेत जम्बो लसीकरण मोहिमेला पुन्हा ब्रेक

Published On: 

औरंगाबाद : पुन्हा एकदा लसींचा साठा नसल्यामुळे आता महापालिकेच्या लसीकरण मोहिमेला ब्रेक लागला आहे. गुरुवारी रात्री १५ हजार लसींचा साठा मनपास प्राप्त झाला. मात्र दोनच दिवसात हा साठा संपला. त्यामुळे लसीकरण मोहीम पुन्हा एकदा संकटात सापडली आहे.
यापूर्वी चार दिवस लस शिल्लक नसल्याने लसीकरण केंद्र बंद होते. आता पुन्हा एकदा नव्याने लसींचा पुरवठा कधी होईल, याची शाश्‍वती नाही.

औरंगाबाद शहरात जानेवारी महिन्यापासून लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. अलीकडे १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू होताच पालिकेच्या जम्बो लसीकरण मोहिमेला वेग आला होता. पालिकेने शहरात ११५ वॉर्डात जागोजागी केंद्र सुरू करून लसीकरण करण्यावर जोर दिला होता. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लसींचा साठा मुबलक असल्याने ७५ ते ८० हजारापर्यंत नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

लसीकरणाला तरूणांचा भरघोस प्रतिसाद मिळाल्याने लसीचा साठा पाच दिवसातच संपला. लसींचा साठा संपल्यामुळे सोमवारपासून लसीकरण बंद पडले होते. गुरुवारी १५ हजार लसींचा साठा आला. मात्र तो दोनच दिवसात संपला. आता पुन्हा एकदा लसीकरण बंद पडले आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने शासनाने एक लाख लस मिळावी, अशी मागणी केली आहे. मात्र अजूनही लस मिळालेली नसून कधी मिळेल, याची देखील शाश्‍वती नाही, असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी स्पष्ट केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!