🕒 1 min read
औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात यंदाही पायी वारीला परवानगी नाकारण्यात आली आहे. राज्य सरकारचा आदेश झुगारत ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बंडातात्या कराडकर पंढरपूरच्या दिशेने निघाले होते. पण रस्त्यातच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकारामुळे राज्य सरकारवर चौफेर टीका होत असून वारकऱ्यांमध्येही नाराजी आहे. यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनीही ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
खासदार इम्तियाज जलील यांनी या घटनेचा निषेध करत सोशल मीडियाच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, ‘वारकरी पंढरपूर पर्यंत २०० कि.मी. चा अंतर पायी वारी करतात ही महाराष्ट्रातील एक जुनी परंपरा आहे. शेतकरी, ग्रामीण भागातील लोक दरवर्षी या धार्मिक कार्यक्रमाची वाट पाहतात, परंतु त्यांना सहभागी होऊ न देणे, छळ करणे आणि अटक करणे अगदी निंदनीय आहे. महाराष्ट्र सरकारचा निषेध..!’
वारकरी पंढरपूर पर्यंत २०० कि.मी. चा अंतर पायी वारी करतात ही महाराष्ट्रातील एक जुनी परंपरा आहे. शेतकरी, ग्रामीण भागातील लोक दरवर्षी या धार्मिक कार्यक्रमाची वाट पाहतात, परंतु त्यांना सहभागी होऊ न देणे, छळ करणे आणि अटक करणे अगदी निंदनीय आहे. महाराष्ट्र सरकारचा निषेध..!
— Imtiaz Jaleel (@imtiaz_jaleel) July 5, 2021
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही वारीला परवानगी नाकारण्यात आली आहे. यावरुन भाजपच्या वतीने राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे. त्यातच आता एमआयएमने देखील राज्य सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. राज्यातील अनेक वारकरी देखील या निर्णयामुळे नाराज झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- मोहन भागवतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर ओवेसी म्हणाले, ‘ही तर हिंदुत्त्वाचीच देण’
- ‘हिंदू-मुस्लिम वेगवेगळे नाहीत, सर्वांचा डीएनए एकच’, मोहन भागवत यांचे वक्तव्य
- ‘मराठा समाजाच्या प्रश्नांवर वादविवाद नकाे’, संभाजीराजेंचे आवाहन
- ‘इम्पेरिकल डेटा केवळ राज्य सरकार गोळा करू शकते, ठराव फक्त दिशाभूल करण्यासाठी’
- ओबीसी आरक्षणासाठी केंद्राने इम्पेरिकल डेटा देण्यासाठीचा ठराव विधानसभेत मंजूर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
