मुंबई : मुंबईतील वरळीचे आमदार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना २० मार्च रोजी कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांनी ट्विट करुन ही माहिती दिली होती तेव्हापासून आदित्य ठाकरे यांच्यावर उपचार सुरु होते. तर आदित्य ठाकरे यांची आई रश्मी ठाकरे यांनाही कोरोना झाला होता. त्यांच्यावर मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र, आता त्यांचा प्रकृतीही स्थिर आहे.
कोरोनावर मात करुन आदित्य ठाकरे यांनी कमबॅक केलं आहे. सध्याची वाढती कोरोनाग्रस्तांची रुग्णसंख्या पाहता वरळी मतदारसंघातील नेहरु सायन्स सेंटरमध्ये १५० बेड्स तर पोद्दार रुग्णालयात २२५ बेड्सचं अद्यावत सोयीसुविधा असलेलं कोविड सेंटर उभारण्यात आलं आहे. या सेंटरचं उद्घाटन आदित्य ठाकरेंच्या हस्ते करण्यात आलं.
उद्घाटन प्रसंगी आदित्य ठाकरे सध्या सुरु असलेल्या राजकारणावर बोलायला विसरले नाहीत. ‘कोराना काळात जे राजकारण सुरु आहे, ते सुरु राहू द्या, त्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. लोकांचा जीव महत्त्वाचा आहे. एवढंच नव्हे तर लसीवरुन जे काही सुरु आहे त्याबद्दल मी काही सांगायची गरज नाही,’ असं वक्तव्य त्यांनी केलं. ‘लवकरच मी फिल्डवर ॲक्टिव्ह होईन,’ असा विश्वास देखील आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला.
आदित्य ठाकरे हे अखेर कोरोनामुक्त झाले आहेत. नुकतीच त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. यानंतर आदित्य ठाकरे पुन्हा कामालाही लागले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आमच्या सभांमध्ये पाऊस आला की भाजपला धसकाच बसतो!’, धनंजय मुंडेंचा टोला
- ‘मुख्यमंत्र्यांची आता फक्त कोरोनाशी चर्चा बाकी आहे, त्यानंतर ते लॉकडाऊनचा निर्णय घोषित करतील’
- नोबेल पुरस्काराप्रमाणे टागोर यांच्या नावानेही पुरस्कार सुरू करणार – अमित शाह
- एक्सपायरी डेट संपलेल्या बाटल्यांवर नवं स्टिकर लावून होतेय रेमडेसिव्हीर इंजेक्शनची विक्री
- शालिवाहन नगरीत ऐतिहासिक तीर्थ खांबावर उभारली गुढी!


