कोलकाता : नोबेल पुरस्काराच्या धर्तीवर टागोर पुरस्कार सुरू करून जगभरातील कला, विज्ञान आणि साहित्य क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना बंगाल सरकारच्या वतीने सन्मानित करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ते सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत या दरम्यान ते बोलत होते.
पश्चिम बंगालमधील निधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने जोरदार प्रयत्न सुरू आहे. त्यात विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील भाजपला चांगलीच टक्कर देत आहेत. त्यामुळे सध्या बंगगालमध्ये आरोप-प्रत्यारोप ऐकायला मिळत आहे. त्यातच अमित शाह यांनी दिलेले हे आश्वासन मतदारांच्या किती पचणी पडेल हे सांगता येणार नाही.
रविंद्रनाथ टागोर हे नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय तसेच पहिले आशियाई व्यक्ती देखील होते. त्यांनी वयाच्या ८ व्या वर्षी पहिली कविता लिहिली होती. भारतीय साहित्य क्षेत्रात त्यांचे योगदान खुप मोठे आहे. त्यांच्या नावाने हा पुरस्कार जाहीर झाल्यास अनेकांना आनंद होणार आहे. मात्र, पश्चम बंगाल निवडणुकीत त्याचा किती पारिणाम होतो, ते निकालानंतरच स्पष्ट होईल.
महत्त्वाच्या बातम्या
- मायच्यान कोणाचाही नाद करा, पण पवार साहेबांचा नाद करु नका – धनंजय मुंडे
- कुंभमेळ्यातील गर्दीवरून संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले..
- …म्हणून आशिष शेलार यांनी मानले वर्षा गायकवाड यांचे आभार
- प्रकाश जावडेकर… तुम्ही महाराष्ट्रात राहता हेच आमचे दुर्देव
- उद्धव काका घरी किराणा पाठवणार आहेत का? डीमार्ट बंद झाल्याने तरुणीचा संतप्त सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

