मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुऴे मुंबईचे मोठं नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे आणि विजेचे खांब पडले आहेत. घराचं नुकसान झालं आहे. शिवाय इथल्या रस्त्यांचेही नुकसान झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. वादळामुळे अनेक ठिकाणी झाड उन्मळून पडली होती. अनेक ठिकाणी यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे.
चक्रीवादळामुळे मुंबई शहरात 2 हजार 364 वृक्ष उन्मळून पडल्याच्या तक्रारी पालिकेला प्राप्त झाल्या आहेत. वादळानंतर 48 तास उलटूनही रस्त्यावर पडलेल्या वृक्षांच्या फांद्या हटविण्यात आलेल्या नाहीत. याबाबत उद्यान विभागाकडे विचारणा केली असता हे काम करण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती झाली नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलंय. गेल्या 3 महिन्यापासून वृक्ष छाटणीसाठी कंत्राटदाराच्या नियुक्तीचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समिती समोर 18 मार्च 2021 पासून आजतागायत प्रलंबित आहे. याला जबाबदार कोण? असा सवाल भाजपनं केलाय. येत्या आठवडाभरात वृक्ष प्राधिकरणामध्ये वृक्ष छाटणीच्या प्रस्तावास मंजुरी देऊन प्रत्यक्ष वृक्ष छाटणीस प्रारंभ केला नाही तर मुंबई महापालिकेवर सदोष वृक्षवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी भाजपा उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावेल, असा इशारा भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी स्थायी समितीत दिला.
दरम्यान चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात आणि दिवला भेट देऊन तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहे. भावनगर, उना, दिव,जाफराबाद आणि महूआ या भागाची हवाई पाहणी देखील पंतप्रधान करणार असून अहमदाबाद इथं आढावा बैठक घेणार आहेत. तर महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील कोकणाचा २ दिवसीय दौरा करणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
- राज्यात बियाणे धोरण तत्काळ तयार करण्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांचे आदेश
- वादळाच्या संकटाची फोटोशूटसाठी संधी घेण अभिनेत्रीला पडलं महागात…
- ‘हक्क मागतोय, भीक नाही ! सरकारच्या मानेवर बसून आरक्षण मिळवण्यासाठी सज्ज व्हा…’
- ‘मी स्वतःला खूप नशीबवान समजतो..’; अर्जुन कपूरने व्यक्त केली भावना
- ‘फँड्री’ सिनेमातील शालूचा हटके अंदाज पाहून होताल थक्क …
- ‘सीआयडी’ मालिकेतील कलाकाराचे लग्नाच्या १७ वर्षांनंतर थांबले वैवाहिक आयुष्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

