मुंबई : कोरोना रोगाने मागील वर्षीपासून जगभरात थैमान घातले आहे. बऱ्याच देशांमधील कोरोना हा पूर्णपणे आटोक्यात येत असला तरी भारतात मात्र अजूनही संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका हा कायम आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रासह देशभरात हाहाकार माजवला होता. यामुळे आता निर्बंधांमध्ये सूट देताना राज्य सरकार व प्रशासन हे गंभीरतेने विचार करूनच निर्णय घेत आहेत.
यंदा देखील कोरोनाचे सावट कायम असल्याने सर्व धर्मियांनी सण-उत्सव साधेपणाने साजरे करावे असे आवाहन केले जात आहे. मात्र, कोरोना प्रतिबंधक नियम पाळून, गोविंदांचे लसीकरण करून अटींसह दहीहंडी उत्सव साजरा करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी गोविंदा पथकांनी राज्य सरकारकडे केली होती. याबाबत आज गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी, ‘जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन, त्यांचे प्राण वाचविण्यासाठी आपण सण -वार, उत्सव काही काळासाठी बाजूला ठेऊ, मानवता दाखवू आणि कोरोनाला पहिले हद्दपार करू असा संदेश महाराष्ट्राने जगाला द्यावा,’ असं आवाहन या गोविंदा पथकांना केलं आहे. त्यामुळे यंदा देखील दहीहंडी उत्सवास परवानगी नसेल असे संकेत मुख्यमंत्री ठाकरेंनी दिलेत.
मुख्यमंत्री ठाकरेंनी नेमका काय इशारा दिला ?
‘बाळ गोपाळांचा हा उत्सव आहे. गेल्या वर्षी पासून जी लहान बालकं अनाथ झालेली आहेत. त्यांची काय अवस्था आहे हे आपण पहावं. लस घेतल्यावर देखील काही देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. इस्त्रायलने तर पुन्हा मास्क घालायला सुरवात केलीय. अर्थ चक्र चालवण्यासाठी आपण थोडी शिथिलता दिली आहे. कारण अनेकांची हातावर पोट आहेत. त्यांच्यासाठी आपण हा निर्णय घेतलांय. आपण जर समजूतीने वागलो नाही तर धोका अटळ आहे,’ अशी भीती वजा इशारा मुकभ्यमंत्री ठाकरे यांनी या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे झालेल्या बैठकीत व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘घाबरु नका, तिसऱ्या लाटेची तयारी पूर्ण’; राजेश टोपेंचे राज्याला आवाहन
- पाकिस्तानी फवाद आलमने रचला इतिहास ; अशी कामगिरी करणारा आशियाचा पहिलाच फलंदाज
- ‘अफगाणिस्तानमधील संकटामुळे भारतात CAA कायदा किती महत्त्वाचा आहे हे समोर आलं’
- ‘लवकरच मोठे शतक येणार आहे’ विराटच्या आयसीसी क्रमवारीवर प्रशिक्षकाची प्रतिक्रिया
- ‘सुभाष जाधव या शेतकऱ्याचा मृत्यू टळला असता मात्र त्यासाठी मंत्रालयात कोणी मंत्री तर हवा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

