🕒 1 min read
पुणे : केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे मोदी सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून ओळखले जातात. कोरोना काळात देखील त्यांनी महाराष्ट्रासाठी खास प्रयत्न करून संकटात मोठी मदत केली होती. तर, त्यांच्या रस्ते बांधणीच्या विक्रमी नोंदीमुळे ते आता ‘रोडकरी’ म्हणून ओळखले जात आहेत. फारसे कधी न संतपणारे गडकरी आता मात्र शिवसेनेच्या दहशत पसरवणाऱ्या कारवायांमुळे चांगलेच संतापले आहेत.
इतकंच नाही तर त्यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून कारवाईचा इशारा देखील दिला आहे. काल हे पत्र बाहेर आल्यानंतर राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ‘काल ही बातमी वाचली. आता तो आरोप आहे. त्यात तथ्य आहे की नाही हे तपासून पाहावं लागेल. मी 30-40 वर्षांपासून समाजकारण आणि राजकारणात आहे. मी नेहमी सांगतो हा जनतेचा पैसा असतो. त्याचा विनियोग व्यवस्थित झाला पाहिजे,’ असं पवार म्हणाले.
यासोबतच, ‘कामाचा दर्जा चांगला राखला पाहिजे. तो राखला जात नसेल तर संबंधित कंत्राटदारावर कारवाई केली पाहिजे. जर यदाकदाचित कंत्राटदार त्या भागात चांगलं काम करत असताना काही जण कुठल्या तरी राजकीय पक्षाचा आधार घेऊन किंवा कुठल्या तरी मिळवलेल्या पदाचा आधार घेऊन कुणाला त्रास देत असेल तर तो त्रास ताबडतोब थांबवला गेला पाहिजे. म्हणून गडकरींनी मुख्यमंत्र्यांना त्याबाबतचं पत्रं दिलं आहे,’ असं देखील पवार यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी जिल्ह्यामधील सर्व यंत्रणा सज्ज – पालकमंत्री सुभाष देसाई
- ‘आजपासून २५ वर्षांनी जे कोणी पंतप्रधान असतील…’
- ‘मला अजितदादाही १२ आमदारांबद्दल बोलत नाहीत, तुम्ही कोण विचारणारे?’ राज्यपालांनी काँग्रेस नेत्याला सुनावले
- ‘जम्मू काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका’, स्वातंत्र्यदिनी मोदींची मोठी घोषणा
- कोरोना संकटातील भारताची लढाई हा जगभरात चर्चेचा विषय-पंतप्रधान मोदी

