Share

…त्यामुळे भारताचे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हद्दीत पडले- राजनाथ सिंह

Published On: 

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी भारतीय हद्दीतून एक क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हद्दीत घुसल्याची घटना घडली होती. दरम्यान, आज(१५ मार्च) राज्यसभेत बोलत असतांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती दिली आहे.

यासंदर्भात बोलत असतांना राजनाथ सिंह म्हणाले की,‘९ मार्च रोजी ही घटना घडली. क्षेपणास्त्र युनिटची नियमित देखभाल आणि तपासणी सुरू असताना संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास अपघाताने क्षेपणास्त्र सोडण्यात आले. नंतर हे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हद्दीत पडल्याची माहिती मिळाली.’

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘या घटनेसंदर्भात ऑपरेशन, देखभाल आणि तपासणीसाठी मानक ऑपरेटिंग प्रक्रियांचा आढावा घेतला जात आहे. आम्ही आमच्या शस्त्र यंत्रणेच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देतो. यासंदर्भात काही त्रुटी आढळून आल्यास तत्काळ दुरुस्त करण्यात येईल.’ तसेच ही घटना खेदजनक असल्याचेही राजनाथ सिंह म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!