🕒 1 min read
मुंबई: राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे. नवाब मलिक यांना ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात (Money laundering case) अटक केली आहे. आपली अटक बेकायदेशीर असल्याचं सांगत नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) ईडीच्या कारवाई विरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिकांची याचिका फेटाळून लावली आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिकांची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी आता तरी नवाब मलिकांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते अतुल भातखळकर यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
“शेतीला दिवसा वीज द्या अन्यथा घोटाळे बाहेर काढू” – राजू शेट्टी आक्रमक
-
“प्रवीण दरेकरांवर जाणीवपूर्वक गुन्हा दाखल झाला”, फडणवीसांचा आरोप
-
‘महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्र पुढे गेलो पाहिजे’ – विजय वडेट्टीवार
-
“…आता तरी हिजाबवर ‘controversy’ करणाऱ्यांनी चूप बसावे”, फडणवीसांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
