मुंबई : विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित काश्मीर फाईल्स ह्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. काश्मीर पंडितांवर झालेला अत्याचार,त्यांना करावं लागलेलं पलायन यांवर हा चित्रपट भाष्य करतो.
देशातील काही वर्ग या चित्रपटाचे कौतुक करतोय तर काही वर आपले मत मांडून विरोध करत आहेत असे सोनू निगमने सांगितले. बऱ्याचदा त्याला ट्रोलींगचा देखील सामना करावा लागला आहे. 1989,1990 सालात काश्मिरी पंडित नरसंहाराला बळी पडल्याने ही कथा ह्या चित्रपटात दाखवली गेली आहे.
‘टाईम्स नाऊ’ला बोलताना सोनू निगम म्हणाला या चित्रपटात हृदयद्रावक कथा आहे म्हणून मी काश्मीर फाईल्स पाहिला नाही. इतर गुन्ह्यांबाबत व घटनांबाबत मी संवेदनशील आहे असे देखील तो म्हणाला.
या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर,पल्लवी जोशी, मराठी चित्रपट सृष्टीतील मृणाल कुलकर्णी तसेच चिन्मय मांडलेकर यांनी बिट्टा या आतंकवाद्याची केलेली भूमिकेत आहेत.
महत्वाच्या बातम्या –


