Share

‘…तर रक्तरंजित लढाईला तयार राहा’; शिवसेना आमदाराचाच ठाकरे सरकारला इशारा

Published On: 

सांगोला : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी जलाशयातून ५ टी.एम.सी. पाणी इंदापूरला नेले असून या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील स्वाक्षरी झाली आहे. इंदापूरकरांसाठी हा ऐतिहासिक निर्णय असल्याच्या बातम्या सोलापूर जिल्ह्यात धडकल्या आणि याच निर्णयाविरोधात सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

सोलापुरातील भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडल्यानंतर महाविकास आघाडी पक्षातील नेत्यांनीच सरकारला घरचा आहेर दिला आहे. आता सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजी पाटील यांनी रक्तरंजित लढाईला तयार राहा, असा आक्रमक इशाराच ठाकरे सरकारला दिला आहे. आमदार पाटील यांच्या चीक महुद येथील निवासस्थानासमोर उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने हलगी नाद आंदोलन केले. यावेळी त्यांनी देखील उजनीचे पाणी इतरत्र वळवण्याला तीव्र विरोध केला आहे.

‘सोलापूरमधील लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवून अचानकपणे महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय घेतला आहे. सोलापूरला सिंचनासाठी इतर कोणत्याही धरणावर अवलंबून राहता येणार नसल्याने उजनी हेच जिल्ह्याचा आणि शेतकऱ्यांचा प्राण आहे. त्यामुळे हे अन्यायकारक असून शिवसेना आमदार म्हणून सर्व शक्ती पणाला लावणार असून कायदेशीर लढाई लढू आणि रक्तरंजित लढाईला तयार रहावे,’ असा इशारा शहाजी पाटील यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!