🕒 1 min read
मुंबई: काल (१९ फेब्रुवारी) देशभरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते अतुल लोंढे पाटील (Atul Londhe) यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात पियुष गोयल छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करत आहेत. (Single mention of Chhatrapati Shivaji Maharaj) यावरूनच त्यांनी संताप व्यक्त करत टीका केली आहे.
“आपण आचार्य विद्यासागर महाराज म्हणालात योग्य आहे. आपण मोदीजी म्हणालात योग्य आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांना, एकेरीत “शिवाजी” का? असा उपमर्द/अपमान करण्याची हिम्मत कशी होते?”, असा सवाल अतुल लोंढे पाटील यांनी केला आहे. याबाबतचा व्हिडिओही त्यांनी पोस्ट केला आहे.
आपण आचार्य विद्यासागर महाराज म्हणालात योग्य आहे!
आपण मोदीजी म्हणालात योग्य आहे! पणछत्रपती शिवाजी महाराजांना, एकेरीत “शिवाजी” का? असा उपमर्द/अपमान करण्याची हिम्मत कशी होते? pic.twitter.com/XJYrqHTUwU
— Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)???????? (@atullondhe) February 20, 2022
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आणि महराष्ट्राविषयी भाजप जाणूनबुजून राजकारण करत असल्याचा आरोप अगोदर पासूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी केला आहे. आता त्यात पियुष गोयल (Union Minister Piyush Goyal) यांनी केलेल्या एकेरी उल्लेखावरून भाजपला निशाण्यावर धरले जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “मराठी भाषा गौरव दिन जेवढा भव्य करता, तेवढा करा”, मनसेचे आवाहन
- भाजप-सेना आरोप-प्रत्यारोपाच्या मुद्द्यावर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया; म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी आता तरी…”
- मनसेचे मिशन नवीमुंबई; एक लाख मुंबईकरांना भेटण्याचा मानस
- रशियात युद्धजन्य परिस्थिती; जयंत पाटलांनी केली पंतप्रधान मोदींकडे ‘ही’ मागणी
- शिवजयंतीनिमित्त कार्यक्रमात नाना पाटेकरांनी सुनावले खडेबोल; म्हणाले, ‘निवडून देतो म्हणजे…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
