🕒 1 min read
मुंबई: राज्यात सध्या भाजप-शिवसेना (BJP-Sena allegations) आरोप प्रत्यारोपाची फेरी सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे. भाजपकडून सतत महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना टार्गेट केले जात आहे. भाजपकडून भ्रष्टाचारावरून ठाकरे सरकारला निशाण्यावर धरले जात आहे. आता या आरोप-प्रत्यारोपावरच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar reaction) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यात सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप गंभीर वळणावर आले असून ते फक्त आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप प्रत्यारोप राहिले नाहीत. तर, आता अनेक हत्यांचे आरोपही केले जात आहेत. हत्यांच्या आरोपांबाबत एखाद्या पोलीस अधिकारी किंवा गृहमंत्र्यांनी वक्तव्य देऊन चालणार नाही. त्यासंदर्भात आता मुख्यमंत्र्यांनी मौन सोडून भाष्य करावे आणि सत्य परिस्थिती समोर आणावी असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
तसेच एंटेलिया स्फोटक प्रकरण आणि शंभर कोटी रुपये वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांनीच माफीचा साक्षीदार व्हावं, असेही प्रकाश आंबडेकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपाच्या फेरीत राज्यातील राजकारण तणावकारक बनत असल्याचे सध्या म्हटले जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
- रशियात युद्धजन्य परिस्थिती; जयंत पाटलांनी केली पंतप्रधान मोदींकडे ‘ही’ मागणी
- शिवजयंतीनिमित्त कार्यक्रमात नाना पाटेकरांनी सुनावले खडेबोल; म्हणाले, ‘निवडून देतो म्हणजे…’
- ‘त्या’ समन्सविरोधात सोमय्या आक्रमक; म्हणाले, “ठाकरे सरकारच्या घोटाळेबाजांनी..”
- क्रिकेटच्या मैदानातही धनंजय मुंडेंची फटकेबाजी; ७ चेंडूंत केल्या ११ धावा
- सुशांतसिंगच्या मुद्द्यावरून राणेंचा पुन्हा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
