Share

रशियात युद्धजन्य परिस्थिती; जयंत पाटलांनी केली पंतप्रधान मोदींकडे ‘ही’ मागणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: रशिया आणि युक्रेन या देशात युद्धजन्य परिस्थिती (Russia-Ukraine war situation) निर्माण झाली आहे. युक्रेनच्या लष्कराने युद्ध सुरू झाले असल्याचे पत्रक काढून नागरीकांना सतर्क केले आहे. या पार्श्वभूमीवरच राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil ) यांनी ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे (Prime Minister Narendra Modi) मागणी केली आहे.

“रशिया आणि युक्रेन सीमेवरील परिस्थिती गेल्या १५ दिवसांपासून चिघळत चालली आहे. याठिकाणी सुमारे १८ हजार भारतीय आहेत, त्यापैकी बहुतेक युक्रेनमधील विद्यार्थी आहेत, ते मदतीची वाट पाहत आहेत. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करतो की, विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि त्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावेत. ते आपले भविष्य आहेत.”, असे ट्वीट जयंत पाटील यांनी केले आहे.

दरम्यान युक्रेनच्या लष्कराने युद्ध सुरू झाले असल्याचे पत्रक काढून नागरीकांना सतर्क केले आहे. तर रशियातील बंडखोर यांनीही युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने घराबाहेर पडू नका असे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांची मागणी चर्चेचा विषय ठरत आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!