मुंबई: बेळगाव येथे महानगरपालिकेवर भाजप पक्ष निवडून आला आहे. यावरच भाजप नेत्यांनी राज्यात पेढे वाटून त्याचा आनंद साजरा केला. तर दुसरीकडे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी यावर नाराजी व्यक्त करत मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता, लाज वाटत नाही, अशा शब्दात बेळगावच्या भाजपच्या विजयावर त्यांनी संताप व्यक्त केला आहे. यावरूनच भाजप नेते नितेश राणे यांनी ट्वीट करत संजय राऊत यांच्यावर निशाना साधला आहे.
‘संतोष पेडणेकर, जयंत जाधव, रवी धोत्रे, सविता कांबळे, रेश्मा पाटील व असे अनेक मराठी उमेदवार बेळगावात निवडून आले, हे मराठी नाही का संज्या? की फक्त शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले नाही म्हणून ते मराठी नाही?संज्या तुझ्यासारखा रड्या या जगात दुसरा सापडणार नाही. अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.
संतोष पेडणेकर, जयंत जाधव, रवी धोत्रे, सविता कांबळे, रेश्मा पाटील व असे अनेक मराठी उमेदवार बेळगावात निवडून आले, हे मराठी नाही का संज्या??? की फक्त शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले नाही म्हणून ते मराठी नाही?? संज्या सारखा रड्या या जगात दुसरा सापडणार नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 8, 2021
दरम्यान बेळगाव येथे मराठी माणूस नाही तर शिवसेना हरली आहे. असा आरोप भाजपने केला आहे. तर एवढ्या वर्षांपासून तिथे प्रशासक नेमला होता. पण अचानक तिथे निवडणूक घेण्यात आली. प्रचाराला वेळ मिळू दिला नाही. हे सर्व प्रकरण पाहिल्यावर हा पराभव घडला हे दुर्दैव असलं, तरी कर्नाटकचं सरकार सीमाबांधवांचा आवाज कोणत्या पद्धतीने दडपतंय हे पाहिलं की अंगावर काटा उभा राहतो. तरीही आमचे लोक तिथे संघर्ष करतात, लाठ्या खातायत,तुरुंगात जाताय. त्याचं कौतुक करायला हवं. तर तुम्ही पेढे वाटताय? असा खोचक टोला राऊत यांनी लगावला होता.
महत्त्वाच्या बातम्या
- सुनेचे गंभीर आरोप, रामदास तडस यांना तात्काळ अटक करा ; रुपाली चाकणकरांची मागणी
- उदाहरण कसले द्यायचे हे नाना पटोले यांना समजतं का?, मनसेचा संतप्त सवाल
- राणे आणि शिवसेना पुन्हा आमने-सामने ! ‘मुख्यमंत्र्यांशिवाय चिपी विमानतळाचे उद्घाटन शक्य’
- ब्राह्मण समजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या वडिलांना अटक
- केंद्राने महाराष्ट्राला दिलेला इशारा गणेश मंडळांनी पाळला पाहिजे – राजेश टोपे


