Share

केंद्राने महाराष्ट्राला दिलेला इशारा गणेश मंडळांनी पाळला पाहिजे – राजेश टोपे

Published On: 

पुणे : कोरोना महामारीने मागील वर्षीपासून जगभरात थैमान घातले आहे. बऱ्याच देशांमधील कोरोना महामारी आटोक्यात येत असली तरी भारतात मात्र अजूनही संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका हा कायम आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रासह देशभरात हाहाकार माजवला होता. यामुळे आता निर्बंधांमध्ये सूट देताना राज्य सरकार व प्रशासन हे गंभीरतेने विचार करूनच निर्णय घेत आहेत.

दरम्यान, आता सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील जनतेला याबाबत कळकळीचे आवाहन केलं आहे. आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांना सतर्कतेचं आवाहन केलं आहे.

‘गणेशोत्सव हा सर्वांसाठी उत्साहाचा असा सण आहे. दहा दिवस सर्वच गणेशभक्त आनंदाने हा उत्सव साजरा करतात. मात्र कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्व सूचनांचे पालन करुन सण साजरा करायला हवा. केंद्र सरकारने केरळ आणि महाराष्ट्राला गर्दी टाळण्यासंबंधी सूचना दिली आहे. हा इशारा गणेश मंडळांनी पाळला पाहिजे. गणेश भक्तांनीही कोरोनाविषयक नियम पाळून सण साजरा करावा, अशी कळकळीची विनंती राजेश टोपे यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!