पंढरपूर : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाल्यानंतर हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथीलता करण्यात आली. त्यामुळे कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळून राज्यात सर्व काही पूर्ववत होत होते. तर, आषाढी वारी, गणेशोत्सव, ईद, नाताळ अशा सर्व धर्मियांच्या सणांवर व धार्मिक कार्यक्रमांवर कोरोनाच्या सावटामुळे निर्बंध होते.
दरम्यान, पुन्हा एकदा राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून यंदा राज्य सरकारने वेळीच कोरोना आटोक्यात आणण्यासाठी पावले उचलल्याचे दिसत आहे. मात्र, माघी यात्रेवरून वारकरी व राज्य सरकार यांच्यात संघर्षाची चिन्हे निर्माण होत आहेत. दरवर्षी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या आषाढी वारीसह कार्तिकी वारी देखील कोरोनामुळे रद्द करण्यात आली होती.
आता, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं अनेक जिल्ह्यांमध्ये नियम कडक करण्यात आले आहेत. यामुळे, 23 फेब्रुवारीला होणारी माघी यात्राही रद्द करण्यात आली आहे. तर एकादशीच्या दिवशी पंढरपूर शहरासह दहा गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीला ह. भ. प बंडा तात्या कराडकर यांनी विरोध केला आहे. वारकऱ्यांचा उद्रेक होईल अशी कृती पोलिसांनी करू नये. अन्यथा वारकरी बाहेर पडले तर सरकारच्या अंगलट येईल, असा थेट इशारा कराडकर यांनी दिला आहे.
वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात मोठ्या प्रमाणात वारकरी जमा होत असतात. मात्र, गर्दी टाळण्यासाठी शहरातील मठ, धर्मशाळांमध्ये दाखल झालेल्या वारकऱ्यांनी मठ रिकामे करण्याचे आदेश पोलिसांनी दिले होते. तसेच मठात वारकरी आढळून आल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला होता. यामुळे वारकरी संप्रदायाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मोठमोठ्या शहरातील बाजारपेठांमध्ये वारीपेक्षा जास्त गर्दी होते. राजकीय पक्षांच्या मेळाव्यांना प्रचंड गर्दी होते . ती चालते मग वारीलाच विरोध का ? असा सवाल देखील वारकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘महाराष्ट्राने पवारांना रिटायर्डच केले पण पंतप्रधानपदाची आस साहेबांना स्वस्थ कुठे बसू देते ?’
- मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून नाही तर स्वतंत्र प्रवर्गाद्वारे आरक्षण द्या – रिपाइं
- मोदीसाहेब ‘मन की बात’ मध्ये गोड- गोड बोलतात पण काम काहीच करत नाहीत
- ‘उद्धवजींचे सरकार नाही रामाचे…नाही भिमाचे…नाही काही कामाचे’
- वाढत्या इंधन दरवाढीवर अखेर ‘अमूल’ ची खास चपराक; ‘या’ टॉपिकलची होतेय चर्चा


