रायगड – राज्यात सध्या कोरोनाचा सर्वत्र कहर पाहायला मिळत आहे. यातच रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा देखील जाणवत आहे. अतीगंभीर कोरोना रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन देऊन त्यांना बरे केले जाते.मात्र रायगड जिल्ह्यात पुरवलेल्या रेमडेसिवीरचा वापर थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
रायगडमध्ये या इंजेक्शनच्या वापरामुळे अनेक रुग्णांवर दुष्परिणाम झाले आहेत. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने रायगड जिल्ह्यात तात्काळ रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर थांबवण्याचे आदेश दिले आहेत. हेटेरो हेल्थकेअर कम्पनिकडून वितरित करण्यात आलेल्या या रेमेडिसीवीरचा वापर थांबविण्याचा आदेश देण्यात आला आहे.
रायगडच्या अन्न व औषध प्रशासनाने हे आदेश दिले आहेत. दरम्यान, जिल्ह्यासाठी ५०० इंजेक्शन पुरविण्यात आले होते, त्यापैकी १२० इंजेक्शन देण्यात आली आहेत. इंजेक्शन दिल्यानंतर यातील 90 जणांना अचानक त्रास जाणवू लागला. याबाबत जिल्हा प्रशासनाला माहिती मिळाल्यानंतर शासनाकडे याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर 28 एप्रिल रोजी आलेली रेमडेसिवीर इंजेक्शन बॅच मधील इंजेक्शन देऊ नका, असे पत्र अन्न व औषध विभागाकडून काढण्यात आले आहे.
दरम्यान, आतापर्यंत कोरोनाच्या उपचारात रेमडेसिविर इंजेक्शन प्रभावी ठरताना दिसून आले होते. मात्र, या ताज्या घटनेमुळे आता रेमडेसिविरच्या वापरावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
- इस्रायलमध्ये बॉनफायर उत्सवात दुर्घटना, ३० जणांचा मृत्यू
- आयपीएलमध्ये आज पंजाब किंग्ससमोर आरसीबीचे तगडे आव्हान
- ‘आम्हाला दाभोळकरांचे संस्कार नको’;भाजप प्रवक्त्याचे धक्कादायक विधान
- पृथ्वी शॉच्या तडाख्यानंतर दिल्लीचा केकेआरवर ७ गडी राखुन दणदणीत विजय
- मुंबईत लसींचा तुटवडा, आजपासून पुढचे तीन दिवस लसीकरण बंद !

