Share

“खोटं पण रेटून कसं बोलावं हे राज ठाकरेंकडून शिकावं”, श्रीमंत कोकाटे यांचे टीकास्त्र

Published On: 

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल १ मे रोजी औरंगाबादेत सभा घेतली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधीविषयी मोठे वक्तव्य केले. रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली होती, असा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला होता. यामुळे एका नवीन वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून आता इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे (Shrimant Kokate) यांनी टीका केली आहे.

यासंदर्भांत प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना श्रीमंत कोकाटे म्हणाले की,‘शिवरायांच्या नावावरती पैसे खाणाऱ्या टिळकांनी रायगडावर एक साधा दगडही बसवला नाही. त्या टिळकांनी शिवसमाधीचं बांधकाम केलं, असं धादांत खोटं राज ठाकरे बोलत आहे’, कोकाटे म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘इतिहासाची तोडामोड करून दिशाभूल करणारे राज ठाकरे यांचे कालचे भाषण होते.’ तसेच खोटं पण रेटून कसं बोलावं हे राज ठाकरेंकडून शिकावं. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतका खोटारडा नेता झाला नसेल, असेही कोकाटे यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!