Share

“इतरांना श्रेय देऊन चुकीचा इतिहास पेरल्या जात असेल तर…”, राज ठाकरेंच्या ‘त्या’ दाव्यानंतर मिटकरींचा इशारा

Published On: 

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल १ मे रोजी औरंगाबादेत सभा घेतली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधीविषयी मोठे वक्तव्य केले. रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली होती, असा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला होता. यामुळे एका नवीन वादाला तोंड फुटले आहे. तर यावरच राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari ) यांनी ट्वीट करत इशारा दिला आहे.

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करून नवनवीन शोध लावणाऱ्या महाभागांनो छ. शिवरायांची समाधी शोधून पहिली शिवजयंती साजरी करणारे फक्त क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले होते. इतरांना श्रेय देऊन चुकीचा इतिहास पेरल्या जात असेल तर तरुणांनी यावर गांभर्याने विचार करावा.”, असे आवाहन अमोल मिटकरी यांनी केले आहे.

दरम्यान रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली होती. त्या लोकमान्य टिळकांकडे तुम्ही ब्राह्मण म्हणून बघणार आहात का? लोकमान्य टिळकांच्या पहिल्या वर्तमानपत्राचं नाव मराठा होते. हे पवारसाहेब कधी सांगणार नाहीत.”, असा टोलाही राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीला लगावला होता. यावर आता अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!