Share

धुळे : सामूहिक हत्याकांडामधील  ‘त्या’ ५  मृतांची ओळख पटली

Published On: 

धुळे : राज्यातील विविध भागात मुलं पळवणाऱ्या  टोळींच्या अफवेने भीतीचे वातावरण आहे. यातूनच मारहाणीच्या घटनाही घडत आहेत. अशीच एक घटना धुळ्यातील साक्री तालुक्यात काल घडली होती. यात जमावाने केलेल्या मारहाणीत ५ जण ठार झाले होते .दरम्यान त्या सर्व मृत व्यक्तींची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं  असून, मृतांपैकी सर्व जण सोलापूर तालुक्यातील असून, भिक्षा मागून व्यवसाय करत असल्याचं समोर आलं आहे. साक्री तालुक्यातील राइनपाडा या गावात ही घटना घडली होती .

रविवारी दुपारी बाजाराच्या ठिकाणी एका टेम्पोमधून काही लोक आले होते. सुरुवातीला स्थानिक लोकांना ही मुले पळवणारी टोळी असल्याचा समज झाला. त्यानंतर सर्वत्र ही अफवा पसरली त्यामुळे या व्यक्तींभोवती जमाव वाढत गेला आणि त्यांनी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. जमावाकडून बेदम मारहाण झाल्यानं  अखेर यातील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांना या घटनेची माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, संतप्त आणि आक्रमक झालेल्या जमावामुळे काही वेळातच या व्यक्तींचा मृत्यू झाला. या गंभीर घटनेची दखल पोलिसांनी घेतली असून कोणतीही शहानिशा न करता केवळ अफवेमुळे बेदम मारहाण करणारे लोक कोण होते. यांचा तपास ते घेत आहेत.

मांजरावरील वादातून महिलेचा खून

धुळ्यात मुलं पळविणारी टोळी समजून ५ जणांची हत्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!