नवी दिल्ली : महाराष्ट्रात आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता भाजप अधिक आक्रमक होण्याची शक्यता दिसत आहे. तसेच आता शिवसेनेकडूनही मरगळ झटकून कामाला लागण्याची तयारी सुरु झालेली आहे.
आज शिवसेना खासदारांची बैठक राजधानी दिल्लीत पार पडली. ही बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुचनेनुसार पार पडल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. नवी दिल्लीत पार पडलेल्या शिवसेना खासदारांच्या बैठकीत संघटनात्मक बाबींवर चर्चा झाली असल्याचे देखील सांगितले. २२ मार्चपासून शिवसेनेचं शिवसंपर्क अभियान राबवण्यात येणार आहे असे राऊतांनी सांगितले.
तसेच या अभियाना अंतर्गत शिवसेनेचे खासदार विदर्भ आणि मराठवाड्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. कुठे मरगळ आली असेल तर ती झटकून टाकावी यासाठी शिवसेना खासदार राज्याचा दौरा करणार आहेत, अशी माहितीही संजय राऊत यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

