Share

अकोल्यात शिवसेनेचा पक्षांतर्गत वाद; मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित जिल्हाप्रमुखांवर केले गंभीर आरोप

Published On: 

🕒 1 min read

अकोला: शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख श्रीरंग पिंजरकर (Shrirang Pinjarkar) यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहित आमदार आणि जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील सेनेचे पक्षांतर्गत वाद उफाळून आले आहेत.

पत्रात नेमके काय म्हटले आहे?

दरम्यान श्रीरंग पिंजरकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहित म्हटले आहे की, “आमदार नितीन देशमुख हे खंडणीखोर असून जिल्ह्यात काम करणारे अधिकारी आणि कंत्राटदार नितीन देशमुखांना धास्तावले आहेत. नितीन देशमुख हे चार पक्ष बदलून आले आहेत. देशमुख आधी वंचित बहुजन आघाडीत नंतर जनसुराज्य पार्टीत होते. भाजपच्या पाठिंब्यावर बाळापूर मतदारसंघात पराभूत झाले. नंतर काँग्रेस, अपक्ष असा सारा प्रवास करून शिवसेनेत आलेत. बाजोरीया निवडणुकीत उभे असताना त्यांच्या विरोधात काम केले. असे असले तरी निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्याचं ते कार्य करत आहेत. असा आरोप या पत्रात करण्यात आला आहे.

दरम्यान विधान परिषद निवडणुकीत गोपीकिशन बाजोरिया (Gopikishan Bajoria) यांचा पराभव झाला. आणि येथूनच शिवसेनेतील मतभेद समोर येत आहे. दरम्यान नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात यावी तसेच पक्षांतर्गत नव्याने निवडणुका घेण्यात याव्या, अशी मागणीही श्रीरंग पिंजरकर यांनी लिहिलेल्या पत्रात करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!