मुंबई : महाविकास आघाडी सरकारला वर्षपूर्ती झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने आज पत्रकार परिषदांचा धडाका लावत सरकारच्या वर्षपूर्तीच्या कारभाराला लक्ष्य केलं आहे. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन महाविकस आघाडी सरकारच्या कामगिरीचं काळ पुस्तक प्रकाशित केलं आहे.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह शिवसेना व महाविकास आघाडीतील नेत्यांना लक्ष्य केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुटुंबावर होणाऱ्या टिकेवरून भाजपला टोकाचा इशारा दिला होता. यावर फडणवीसांनी, ‘आम्ही कधीही कोणाच्या घरच्यांवर टीका करत नाही; आम्ही सयंम बाळगतो. यासंदर्भात सर्वात मोठा बळी मी आहे. माझ्या पत्नी बद्दल अधिकृत शिवसेनेचे नेते काय बोलतात, काय लिहितात, ट्विटरवर काय टाकतात हे आपण सर्वानी बघितलंय. पण त्याचा मी कांगावा करत नाही. मी राजकारणात आहे, उत्तराला उत्तरच देईन.’ असं वक्तव्य करत सल व्यक्त केली आहे.
‘उद्धव ठाकरे टिपण्णी करण्याच्या लायकीचे नाहीत’
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामानाला दिलेल्या मुलाखतीवरून फडणवीसांनी घणाघात केला आहे. त्यांनी केलेली विधानं, दावे, टीका यासंबंधी देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला आहे. ‘त्यांच्यावर टिपण्णी करण्याइतपत लायकीचे नाहीत’ अशी बोचरी टीका करतानाच त्यांनी, ‘या सरकारने फक्त स्थगितीच काम केल्याचा ‘ देखील आरोप केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘राष्ट्रवादी महाआघडीतून बाहेर पडणार नाही, भाजपने आता स्वत:च्या जीवावर सत्तेत येण्याची स्वप्ने बघावी’
- ‘माझ्यावर विष प्रयोग करणाऱ्या व्यक्ती बद्दल मला माहित होते’, लता दीदींचा धक्कादायक खुलासा
- मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची लढत चुरशीची होणार !
- ‘अशोक चव्हाण आणि अजितदादांचे फ्यूज उडाले नाही तर आमचे सरकार 20 वर्ष टिकेल’
- ‘गृहमंत्र्यांनी देश चालवायला हवा, अमित शाह छोट्या-छोट्या निवडणुका मॅनेज करण्यात व्यस्त’


