🕒 1 min read
मुंबई : पावसाळ्यात पडणाऱ्या खड्ड्यांमुळे मुंबईतील रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागतो. याबाबत भाजप आणि मनसेने सातत्याने आवाज उठवला. मात्र त्यानंतर आता उशिराने पालिका प्रशासनाला जाग आली आणि मुंबईतील खड्डे भरण्यास मुहूर्त मिळाला आहे. खड्ड्यांची समस्या निकाली काढण्यासाठी अभियंत्यांनी पुढील २ ते ३ आठवडे प्राधान्याने कामे करावीत, असे सक्त निर्देश पालिका आयुक्तांनी यांनी दिले आहेत.
या मुद्द्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. ‘मुंबई आणि ठाणे महानगरपालिका प्रशासन बुजवलेल्या खड्ड्यांचे केवळ आकडे नाचवत असले तरीही प्रत्यक्षात मात्र रस्त्यांच्या चाळणीमुळे प्रवाशांना अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. याविरोधात उठणारा आवाज दाबण्याचे प्रयत्न कितीही प्रयत्न केले, तरीही जनतेचा आवाज दाबता येत नसतो!’ असे ट्विट पाटील यांनी केले आहे.
तसेच ‘डांबरीकरणानंतर केवळ १२ तासांत पुन्हा खड्डे पडले, तेव्हा ठाणे महानगरपालिकेने कंत्राटदारांना अभय देत चार अभियंत्यांना बडतर्फ केले. महानगरपालिका आणि कंत्राटदार यांच्यातील या सहसंबंधांमुळेच चोर सोडून संन्याशालाच फाशी देण्याचा प्रकार शिवसेनेने आरंभला आहे.’
‘दोन्हीही महानगरपालिका प्रशासनाकडून अनेकदा झालेल्या अमुक दिवसांत खड्डे भरू अशा पोकळ गर्जना हा कर्तव्य चोख बजावत असल्याचा आव आणून आजचे मरण उद्यावर ढकलण्याचा प्रकार झाला आहे. मुंबई-ठाण्यातील नागरिकांना या त्रासातून मुक्त करा, नाहीतर जनता येत्या निवडणुकीत योग्य तो धडा शिकवेल असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- सहकारी चळवळीसाठी अमित शहांचे योगदान चांगलं राहील- शरद पवार
- कथित ऑडिओ क्लिपमध्ये रामदास कदमांना फोनवर बोलणारे प्रसाद कर्वे आहेत तरी कोण?
- फडणवीसांना शिवसेना नेता भेटला, अन् देगलूर पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरला!
- ‘कानून वापसी नहीं तो घर वापसी नही’, कृषी कायद्यावरून टिकैत यांचा केंद्राला इशारा
- ‘तो माझा आवाज नाही, व्हायरल ऑडिओ क्लिपची चौकशी करा’, प्रसाद कर्वेंची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

