Share

सिल्लोडच्या ५५ ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा दावा

Published On: 

औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील ८३ पैकी ५५ ग्रामपंचायतींवर शिवसेनेने तर ५१ ग्रामपंचायतंवर भाजपने दावा केला. तालुक्यातील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रभाकर पालोदकर यांच्या पॅनलचा पालोदमध्ये पराभव झाला. भाजयुमोचे माजी प्रदेश उपाध्यक्ष सुनील मिरकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवसेनेचे केशवराव तायडे, भाजपचे नेते सिद्धेश्वर साखर कारखान्याचे माजी चेअरमन श्रीरंग साळवे, पंचायत समितीचे उपसभापती शिवसेनेचे काकासाहेब राकडे यांच्या पॅनललाही मतदारांनी धक्का दिला.

शिवना, अजिंठा, अंभई, डोंगरगाव, घाटनांद्रा, केऱ्हाळा, आमठाणा ग्रामपंचायतीत शिवसेनेने तर उंडणगाव, भवन, अंधारी, भराडी, पळशी येथे भाजपा मित्रपक्षांच्या पॅनलने बाजी मारली. गेवराई सेमी या एकमेव ग्रामपंचायतीत भाजप-शिवसेनेची युती होती. तेथे त्यांना विजय मिळाला.

माजी आमदार सांडू पाटील लोखंडे यांनी मांडणा, भाजपाचे प्रदेश सचिव ईद्रीस मुलतानी यांनी तांडाबाजार, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश बनकर यांनी गोळेगाव (खुर्द व बुद्रुक), शिवसेनेचे बाजार समिती सभापती अर्जुन गाढे यांनी कोटनांद्रा, पंचायत समितीच्या सभापती कल्पना संजय जामकर यांनी आमठाणात वर्चस्व प्रस्थापित केले. भराडी ग्रामपंचायत गजानन महाजन यांच्याकडेच राहिली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!