Share

‘मी यापुढे मार्गदर्शक म्हणून काम करणार’, पेरे पाटील यांची राजकारणातून निवृत्ती?

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : गावातील लोक सुशिक्षित अन् समजदार आहेत. गावाला पुढे घेऊन जाणारे सर्व लोक आहेत. त्यामुळे, गावचा विकास थांबणार नाही. गावच्या राजकारणात अनेक हेवेदावे असतात. पण, निवडून आलेल्या उमेदवार मुलीच्या गळ्यात माझ्या मुलीने हार घातला. यावरून आपण सर्व लक्षात घेतले पाहिजे, असे भास्करराव पेरे पाटील म्हणालेत. यापुढे मी मार्गदर्शक म्हणून काम करणार आहे. त्यासाठी, मी स्वत: वेगळं कार्यालय सुरू केले, अशी माहिती पेरे पाटील यांनी दिली.

राज्यात सगळीकडे ग्रामपंचायतीचा निकालांमध्ये अनेक दिग्गजांना फटका बसलाय. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटलांसह अनेकांना धक्के बसते. पाटोदा गावाचं नाव आदर्श ग्रामपंचायत आणि आदर्श सरपंच म्हणून देशभरात पोहचले, त्यांच्याच पॅनेलला मतदारांनी नाकारल्याचे चित्र आहे. माझ्या मुलीचा पराभव माझ्यासाठी धक्कादायक निकाल नसल्याचे पेरे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या देशाने इंदिरा गांधीसारख्या नेत्यांचाही पराभव पाहिलाय, अशा शब्दात पेरे पाटील यांनी मुलीच्या पराभवाबाबत मत व्यक्त केले.

गेल्या २५ वर्षापासून पाटोदा ग्रामपंचायतीवर सरपंच म्हणून भास्करराव पेरे पाटील काम करत होते. या काळात पेरे पाटलांनी गावचा जो विकास केला त्याचे कौतुक देशभरात झाले. आदर्श गाव म्हणून पाटोद्याला ओळख मिळाली. यंदाची निवडणूक न लढण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. गावच्या तरूण पिढीला पुढे आणण्यासाठी मी माघार घेतल्याचे ते म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!