🕒 1 min read
Shivsena । मुंबई : राज्यात गेल्या दीड महिन्यांपूर्वी मोठा सत्तासंघर्ष पहायला मिळाला. या सत्तासंघर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत भाजपशी हातमिळवणी केली केली आणि राज्यात नवं सरकार अस्तित्वात आणलं. शिंदेंनी शिवसेनेतून बाहेर पडताना ४० आमदारांना सोबत घेतले होते. यानंतर शिवसेनेच्या १२ खासदारांनी देखील शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत शिंदेंना सर्मथन दिले आहे. यानंतर आता शिवसेना मुखपत्र सामानाच्या अग्रलेखातून शिंदे गटावर सडकून टीका करण्यात येत आहे.
नेमकं काय म्हंटल आहे अग्रलेखात ?
50 कोटींत आमदार विकला जातो. या बातम्या धक्कादायक आहेत. त्यामुळे लोकांचा राजकारणावरचा विश्वास उडालाय. हे 50-50 कोटी आदिवासी भागातील आरोग्य सुविधांवर खर्च झाले असते तर अनेकांचे जीव वाचले असते. विधिमंडळात या सगळय़ांवर उठाव व्हावा. उठाव हा शब्द शिंदे गटास प्रिय आहे, म्हणून हे सांगणे. तूर्तास इतकेच! विधानसभेचे पावसाळी अधिवेशन बुधवारपासून सुरू होत आहे. महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि महाप्रलयाचे सावट आहे. शेती, घरे, गुरेढोरे यांचे अतोनात नुकसान झाले.
लोक वाहून गेले. घरसंसार वाहून गेले. पण शिंदे व फडणवीस गटाचे जे सरकार सध्या स्थानापन्न झाले आहे त्यांना राज्याच्या चिंतेपेक्षा स्वतःच्याच चिंतांनी ग्रासले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाला. पण या महोत्सवात महाराष्ट्राच्या वाटय़ाला अमृताचे दोन कण सोडाच. पण लाचारी आणि गुलामीच्याच बेडय़ा पडल्याचे दिसते. शिंदे गटाचे अस्वल झाले व दरवेशी श्री. फडणवीस महोदय आहेत हे एकंदरीत जे खातेवाटप वगैरे झाले त्यावरून स्पष्ट दिसते. भाजपने फेकलेल्या तुकडय़ांवर व खोक्यांवरच त्यांना यापुढे गुजराण करावी लागेल.
खातेवाटपानंतर शिंदे गटात, नाराजीचे भिजलेले फटाके फुटू लागले. म्हणजे आधी हा गट ठाकरे सरकारवर नाराज व आता नव्या व्यवस्थेवर नाराज. शेवटी ‘लेन-देन’ व्यवहारातून एखादे सरकार बनले की दुसरे काय घडायचे? शिंदे ही देना बँक आहे, असे काही आमदार बोलत होते. शिंदे यांनी स्वतः मुख्यमंत्रीपद मिळवले. पण ते औटघटकेचेच ठरेल याविषयी महाराष्ट्राच्या मनात शंका नाही. गृह, अर्थ, महसूल, सार्वजनिक बांधकाम, वने, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण, विधी व न्याय अशी महत्त्वाची खाती भाजपने खिशात घातली. यात आश्चर्य ते काय?
अख्खा शिंदे गटच त्यांनी विकत घेऊन, धाकात ठेवून खिशात घातला तेथे खात्यांचे काय? नगरविकास हे मुख्यमंत्र्यांचे ‘खाते-पिते’ आवडते खाते सोडले तर शिंदे गटाच्या नशिबी दुष्काळच आहे. नगरविकास हे खाते मुख्यमंत्री स्वतःकडे ठेवतात. पण उद्धव ठाकरे यांनी ते शिंदे यांना विश्वासाने बहाल केले होते. साधारणतः मुख्यमंत्र्यांकडे सार्वजनिक प्रशासन, विधी व न्याय अशी खाती असतात. न्याय व्यवस्था भाजपने आपल्या मुठीत ठेवली. चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार हे खातेवाटपाच्या धक्क्यातून सावरले आहेत काय, ते विधानसभेत दिसेल.
महत्वाच्या बातम्या :
- Vinayak Mete | मेटेंच्या जाण्याने चळवळीतील एक लढाऊ नेतृत्व गेलं – हर्षवर्धन पाटील
- Ajit Pawar | सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार, अजित पवारांची राज्य सरकारवर टीका
- Vinayak Mete | विनायक मेटेंचा घातपातच?, शिवसंग्रामच्या कार्यकर्त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल
- Vinayak Mete Wife | विनायक मेटे अपघाताला वेगळं वळण; अपघात की घातपात, मलाही संशय – ज्योती मेटे
- ITBP bus accident | जवानांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात; 7 जवानांचा मृत्यू तर काही जण गंभीर जखमी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
