कोल्हापूर : कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरच्या जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. मात्र आता निवडणुका आल्यावर तुम्ही गुण्यागोविंदाने काम करा. यावेळी बोलताना म्हणाले की, शिवसैनिक काँग्रेसला मतदान करेल का ? तर त्याचे उत्तर होय असेच असेल.
काँग्रेसला मत करणे पाप असेल तर भाजपने मेहबुबा मुफ्तीसोबत युती केलीच ना. शिवसेनेने भाजपची साथ सोडली याचा अर्थ हिंदुत्व सोडले असे होत नाही. कारण भाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे, असे मुख्यमंत्री म्हणाले. भाजप म्हणते, आम्ही बाळासाहेबांचा आदर करतो मग समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्यायला विरोध का केला ?
भाजपला बाळासाहेबद्दल आदर असता तर युती असताना दिलेला शब्द फिरवला नसता, कारण ही बोलणी बाळासाहेबांच्या खोलीत झाली होती.
महत्वाच्या बातम्या :
“भाजपने बनावट हिंदू ह्रदयसम्राट बनवण्याचा प्रयत्न केला”; उद्धव ठाकरेंचा घणाघात
“पवारांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या कामगारांना पुन्हा नोकरीवर घेणार नाही”; अनिल परब
“56 इंचवाले देश विकत आहेत”; नाना पटोले आक्रमक
VIDEO : अचानक मैदानात घुसलेल्या त्या फॅनला रोहितला मारायची होती मिठी; विराटनं दिली ‘अशी’ रिअॅक्शन!
“…तुम्ही धोका दिल्याचं दु:ख”; रावसाहेब दानवेंचा शिवसेनेवर हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

